शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:24 IST

अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरणाविरोधात अंबरनाथ शिवसेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरसकट दोन दिवस बंद न घेता २४-२४ तासांचे दोन बंद आठवडाभरात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही मागणी लागलीच मान्य करण्यात आली. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी हजर राहावे, अशी मोर्चेकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण होते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे (प्रभारी) यांच्या अखत्यारीत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, अधिकाºयांच्या चुकीचा भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. वितरणव्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गळती, दूषित पाणीपुरवठा या मुख्य समस्यांवर अनेकदा चर्चा करूनही त्यावर कोणतेच ठोस निर्णय अधिकाºयांमार्फत घेण्यात आलेले नाहीत. शहरात पाणीसमस्या त्रासदायक असतानाही अधिकारी नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शांतताभंग करेल, या भीतीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाला बंदोबस्त दिला होता. मोर्चेकºयांच्या वतीने अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, चंद्रकांत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, प्राधिकरणाच्या मनीषा पलांडे या अंबरनाथला न आल्याने वाळेकर यांनी संताप व्यक्त केला. पलांडे यांना पूर्वकल्पना देऊनही अधिकारी येत नसतील, तर पाणीप्रश्नावर ते गंभीर नाहीत, असेच दिसत असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला. जोपर्यंत ते येत नाही, तोवर मोर्चा हलणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अखेर, सहा. पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी तडजोड करून चर्चा करण्यास भाग पाडले.शासनाच्या आदेशाप्रमाणे ३७ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वितरणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तीन दिवस पाणी बंद आहे. प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तसेच शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन मुख्य मागण्यांवर प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यावर हा मोर्चा माघारी निघाला. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे