शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:24 IST

अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरणाविरोधात अंबरनाथ शिवसेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरसकट दोन दिवस बंद न घेता २४-२४ तासांचे दोन बंद आठवडाभरात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही मागणी लागलीच मान्य करण्यात आली. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी हजर राहावे, अशी मोर्चेकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण होते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे (प्रभारी) यांच्या अखत्यारीत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, अधिकाºयांच्या चुकीचा भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. वितरणव्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गळती, दूषित पाणीपुरवठा या मुख्य समस्यांवर अनेकदा चर्चा करूनही त्यावर कोणतेच ठोस निर्णय अधिकाºयांमार्फत घेण्यात आलेले नाहीत. शहरात पाणीसमस्या त्रासदायक असतानाही अधिकारी नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शांतताभंग करेल, या भीतीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाला बंदोबस्त दिला होता. मोर्चेकºयांच्या वतीने अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, चंद्रकांत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, प्राधिकरणाच्या मनीषा पलांडे या अंबरनाथला न आल्याने वाळेकर यांनी संताप व्यक्त केला. पलांडे यांना पूर्वकल्पना देऊनही अधिकारी येत नसतील, तर पाणीप्रश्नावर ते गंभीर नाहीत, असेच दिसत असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला. जोपर्यंत ते येत नाही, तोवर मोर्चा हलणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अखेर, सहा. पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी तडजोड करून चर्चा करण्यास भाग पाडले.शासनाच्या आदेशाप्रमाणे ३७ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वितरणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तीन दिवस पाणी बंद आहे. प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तसेच शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन मुख्य मागण्यांवर प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यावर हा मोर्चा माघारी निघाला. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे