शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पालिकेच्या मेहनतीवर केंद्राचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:38 IST

जलवाहतूक एमएमबीकडे : पहिल्या टप्प्यात ५० किमीचा जलमार्ग

अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात होती. मागील दोन वर्षांपासून जलवाहतुकीचे गुºहाळ सुरू आहे. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिश्रम घेऊन जलवाहतुकीचे स्वप्न साकारण्यासाठी पावले उचलली होती. मात्र, त्यांच्या स्वप्नांना केंद्राने फुली मारली आहे. जलवाहतुकीचे पहिल्या टप्प्यातील काम आता ठाणे महापालिका नाही, तर केंद्राने नेमलेल्या एमएमबी अर्थात महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाकडून केले जाणार आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व सोपस्कार केल्यानंतर आता बोर्ड केवळ त्यावर अंमलबजावणीचे काम करणार आहे.

दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतुकीची संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने केव्हाच मंजुरी दिली असून, त्याच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत प्रकल्प राबविला जाणार आहे.ठामपाचा सल्लागारावर एक कोटींचा खर्चपहिल्या टप्प्यातील जलमार्गाची वर्षभरापूर्वीच चाचपणी करण्यात आली होती. खाडीमध्ये बोटी चालविण्यासाठी ओहोटीच्या वेळेतही खाडीमध्ये सहा ते सात मीटर पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाडीमध्ये बोटी उतरवून त्याचीही पाहणी करण्यात आली होती. याशिवाय, खाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ यांचेही परीक्षण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने सल्लागारही नेमून त्यासाठी एक कोटी सहा लाख २० हजारांचा खर्च केला आहे.मेरीटाइम बोर्डाला अहवालाची प्रतीक्षाएवढा सगळा प्रपंच केल्यानंतर आता महापालिकेचेच पंख छाटण्याचे काम केंद्रीय समितीने केले आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व ताट तयार केल्यानंतर त्याची चव चाखण्याचे काम आता या समितीने मेरीटाइम बोर्डाकडे सोपविले आहे. आता मेरीटाइम बोर्ड महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराकडून एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अहवालाची वाट पाहत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. महापालिका आता केवळ बोर्डाला या प्रकल्पाबाबत अपेक्षित असलेली माहिती देण्याचेच काम करणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका