शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालिकेच्या मेहनतीवर केंद्राचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:38 IST

जलवाहतूक एमएमबीकडे : पहिल्या टप्प्यात ५० किमीचा जलमार्ग

अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात होती. मागील दोन वर्षांपासून जलवाहतुकीचे गुºहाळ सुरू आहे. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिश्रम घेऊन जलवाहतुकीचे स्वप्न साकारण्यासाठी पावले उचलली होती. मात्र, त्यांच्या स्वप्नांना केंद्राने फुली मारली आहे. जलवाहतुकीचे पहिल्या टप्प्यातील काम आता ठाणे महापालिका नाही, तर केंद्राने नेमलेल्या एमएमबी अर्थात महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाकडून केले जाणार आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व सोपस्कार केल्यानंतर आता बोर्ड केवळ त्यावर अंमलबजावणीचे काम करणार आहे.

दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतुकीची संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने केव्हाच मंजुरी दिली असून, त्याच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत प्रकल्प राबविला जाणार आहे.ठामपाचा सल्लागारावर एक कोटींचा खर्चपहिल्या टप्प्यातील जलमार्गाची वर्षभरापूर्वीच चाचपणी करण्यात आली होती. खाडीमध्ये बोटी चालविण्यासाठी ओहोटीच्या वेळेतही खाडीमध्ये सहा ते सात मीटर पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाडीमध्ये बोटी उतरवून त्याचीही पाहणी करण्यात आली होती. याशिवाय, खाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ यांचेही परीक्षण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने सल्लागारही नेमून त्यासाठी एक कोटी सहा लाख २० हजारांचा खर्च केला आहे.मेरीटाइम बोर्डाला अहवालाची प्रतीक्षाएवढा सगळा प्रपंच केल्यानंतर आता महापालिकेचेच पंख छाटण्याचे काम केंद्रीय समितीने केले आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व ताट तयार केल्यानंतर त्याची चव चाखण्याचे काम आता या समितीने मेरीटाइम बोर्डाकडे सोपविले आहे. आता मेरीटाइम बोर्ड महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराकडून एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अहवालाची वाट पाहत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. महापालिका आता केवळ बोर्डाला या प्रकल्पाबाबत अपेक्षित असलेली माहिती देण्याचेच काम करणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका