शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर बिवलवाडीत आले पाणी; महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:26 IST

महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

कसारा : कसाऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले बिवलवाडी हे संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. भातसा नदीचा उगम या गावाच्या पायथ्याशी होतो. मात्र, असे असूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे या गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. ही समस्या सोडवण्यासाठी गावच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘टोपाच्या बावडी’तून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलून पाइपलाइनद्वारे ते गावात टाकीत आणून सोडायचे. नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. आठ ते दहा दिवसांत ३६ हजार लिटरची टाकी बांधून पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षक महेश पवार, सहकारी शिक्षक शरद कांबळे, राम वायाळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाइपलाइन टाकली. चार दिवसांत हे काम पूर्ण केले. महावितरणने ततडीने वीजजोडणी केल्याने ७२ वर्षांनंतर पाणी घरात आले.

या गावात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यांनी या गावाला दत्तक घेत रस्ता व काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत बिवलवाडी पहिल्या क्रमांकवर असते. या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यातही प्रशासनास अडचण होत होती. गाव टेकडीवर असल्याने टँकर थेट गावात पोहोचू शकत नसल्याने यावर उपाय काय तर गावाच्या खालच्या बाजूस हायवेजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ‘टोपाची बावडी’ म्हणून विहीर आहे. त्यात टँकरने पाणी आणून ओतले जायचे. तिथून महिला हंडे घेऊन एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून पाणी घरापर्यंत न्यायचे.

गावाच्या एका बाजूला मध्य रेल्वे तर दुसऱ्या बाजूला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, यामुळे बिवलवाडीत बोअरिंगसाठी परवानगी नव्हती. ही व्यथा शिक्षक पवार यांनी पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता सुर्वे -कुशवाह यांच्या कानावर घातली व बिवलवाडीकरांसाठी एक आशेची पालवी फुटली. पालवी संस्थेने टोपाच्या विहिरीतून वाडीत पाणी कशा प्रकारे आणता येईल याबाबत सर्वेक्षण केले. पाणी गावापर्यंत नेण्यासाठी योजना राबवायची झाली तर ३ ते ४ लाख खर्च येणार होता. सुर्वे यांनी सहचारी फाउंडेशन, रोटरी क्लब मुंबई यांच्या मदतीने काम सुरू केले.

गावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या टोपाच्या विहिरीतून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलायचे आणि पाइपलाइनद्वारे ते गावात मोठ्या साठवण टाकीत आणून सोडायचे आणि नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. श्रमदानातून पाइपलाइन टाकून गावात पाणी आले. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे