शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
2
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
3
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
4
मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
5
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
6
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
7
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
8
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
9
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
10
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
11
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
12
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
13
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
14
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
15
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
16
रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
17
गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट
18
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
19
ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
20
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर बिवलवाडीत आले पाणी; महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:26 IST

महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

कसारा : कसाऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले बिवलवाडी हे संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. भातसा नदीचा उगम या गावाच्या पायथ्याशी होतो. मात्र, असे असूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे या गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. ही समस्या सोडवण्यासाठी गावच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘टोपाच्या बावडी’तून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलून पाइपलाइनद्वारे ते गावात टाकीत आणून सोडायचे. नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. आठ ते दहा दिवसांत ३६ हजार लिटरची टाकी बांधून पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षक महेश पवार, सहकारी शिक्षक शरद कांबळे, राम वायाळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाइपलाइन टाकली. चार दिवसांत हे काम पूर्ण केले. महावितरणने ततडीने वीजजोडणी केल्याने ७२ वर्षांनंतर पाणी घरात आले.

या गावात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यांनी या गावाला दत्तक घेत रस्ता व काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत बिवलवाडी पहिल्या क्रमांकवर असते. या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यातही प्रशासनास अडचण होत होती. गाव टेकडीवर असल्याने टँकर थेट गावात पोहोचू शकत नसल्याने यावर उपाय काय तर गावाच्या खालच्या बाजूस हायवेजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ‘टोपाची बावडी’ म्हणून विहीर आहे. त्यात टँकरने पाणी आणून ओतले जायचे. तिथून महिला हंडे घेऊन एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून पाणी घरापर्यंत न्यायचे.

गावाच्या एका बाजूला मध्य रेल्वे तर दुसऱ्या बाजूला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, यामुळे बिवलवाडीत बोअरिंगसाठी परवानगी नव्हती. ही व्यथा शिक्षक पवार यांनी पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता सुर्वे -कुशवाह यांच्या कानावर घातली व बिवलवाडीकरांसाठी एक आशेची पालवी फुटली. पालवी संस्थेने टोपाच्या विहिरीतून वाडीत पाणी कशा प्रकारे आणता येईल याबाबत सर्वेक्षण केले. पाणी गावापर्यंत नेण्यासाठी योजना राबवायची झाली तर ३ ते ४ लाख खर्च येणार होता. सुर्वे यांनी सहचारी फाउंडेशन, रोटरी क्लब मुंबई यांच्या मदतीने काम सुरू केले.

गावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या टोपाच्या विहिरीतून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलायचे आणि पाइपलाइनद्वारे ते गावात मोठ्या साठवण टाकीत आणून सोडायचे आणि नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. श्रमदानातून पाइपलाइन टाकून गावात पाणी आले. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे