शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर बिवलवाडीत आले पाणी; महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:26 IST

महिलांच्या डोक्यावरील हंडे जाणार

कसारा : कसाऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले बिवलवाडी हे संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. भातसा नदीचा उगम या गावाच्या पायथ्याशी होतो. मात्र, असे असूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे या गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. ही समस्या सोडवण्यासाठी गावच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘टोपाच्या बावडी’तून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलून पाइपलाइनद्वारे ते गावात टाकीत आणून सोडायचे. नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. आठ ते दहा दिवसांत ३६ हजार लिटरची टाकी बांधून पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षक महेश पवार, सहकारी शिक्षक शरद कांबळे, राम वायाळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाइपलाइन टाकली. चार दिवसांत हे काम पूर्ण केले. महावितरणने ततडीने वीजजोडणी केल्याने ७२ वर्षांनंतर पाणी घरात आले.

या गावात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यांनी या गावाला दत्तक घेत रस्ता व काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत बिवलवाडी पहिल्या क्रमांकवर असते. या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यातही प्रशासनास अडचण होत होती. गाव टेकडीवर असल्याने टँकर थेट गावात पोहोचू शकत नसल्याने यावर उपाय काय तर गावाच्या खालच्या बाजूस हायवेजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ‘टोपाची बावडी’ म्हणून विहीर आहे. त्यात टँकरने पाणी आणून ओतले जायचे. तिथून महिला हंडे घेऊन एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून पाणी घरापर्यंत न्यायचे.

गावाच्या एका बाजूला मध्य रेल्वे तर दुसऱ्या बाजूला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, यामुळे बिवलवाडीत बोअरिंगसाठी परवानगी नव्हती. ही व्यथा शिक्षक पवार यांनी पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता सुर्वे -कुशवाह यांच्या कानावर घातली व बिवलवाडीकरांसाठी एक आशेची पालवी फुटली. पालवी संस्थेने टोपाच्या विहिरीतून वाडीत पाणी कशा प्रकारे आणता येईल याबाबत सर्वेक्षण केले. पाणी गावापर्यंत नेण्यासाठी योजना राबवायची झाली तर ३ ते ४ लाख खर्च येणार होता. सुर्वे यांनी सहचारी फाउंडेशन, रोटरी क्लब मुंबई यांच्या मदतीने काम सुरू केले.

गावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या टोपाच्या विहिरीतून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलायचे आणि पाइपलाइनद्वारे ते गावात मोठ्या साठवण टाकीत आणून सोडायचे आणि नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. श्रमदानातून पाइपलाइन टाकून गावात पाणी आले. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे