शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:17 IST

प्रशासन म्हणते, कचरा वाढला

मीरा रोड : ऐन सणासुदीला शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर दिवाळीत कचºयाचे वाढलेले प्रमाण तसेच कचºयाचे वर्गीकरण करून नागरिक देत नसल्याने कचरा उचलला गेला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.मीरा- भाईंदरमध्ये दिवाळीच्या सणादरम्यान ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचून असल्याचे दिसत आहे. कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधी पसरून त्यावर घुशी, भटकी जनावरे आदींचे प्रमाण वाढत आहे. भर रस्ता वा नाक्यावर साचलेल्या कचºयाच्या ढीगांमुळे नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे.

सणाच्यावेळी तरी शहरात स्वच्छता असायला हवी होती. मात्र महापालिका डोळेझाक करत असल्याने शहरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका मात्र दिवाळीत कचºयाचे प्रमाण वाढल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, एरव्ही ५०० टन रोज निघणारा कचरा दिवाळी सणात ६०० टनावर गेला आहे.

१०० टनाने कचरा वाढल्याने सफाई कामगार आणि वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे मुख्य कारण आहे. शिवाय सुट्टीनिमित्त कामगारांच्या रजांचा परिणाम कामावर झाला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही काही गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचेही कारण शहरात कचरा साचण्यामागे असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांमधून मात्र महापालिकेचा हा खोटारडेपणा असून शहरातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची तातडीची गरज असल्याचे म्हटले जात आहे. कचरा वर्गीकरण स्वत: पालिका आणि लोकप्रतिनिधीही करत नाहीत. कंत्राटी कामगारांची संख्या कमी असून आहेत ते प्रामाणिकपणे काम करत नसल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक