शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:17 IST

प्रशासन म्हणते, कचरा वाढला

मीरा रोड : ऐन सणासुदीला शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर दिवाळीत कचºयाचे वाढलेले प्रमाण तसेच कचºयाचे वर्गीकरण करून नागरिक देत नसल्याने कचरा उचलला गेला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.मीरा- भाईंदरमध्ये दिवाळीच्या सणादरम्यान ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचून असल्याचे दिसत आहे. कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधी पसरून त्यावर घुशी, भटकी जनावरे आदींचे प्रमाण वाढत आहे. भर रस्ता वा नाक्यावर साचलेल्या कचºयाच्या ढीगांमुळे नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे.

सणाच्यावेळी तरी शहरात स्वच्छता असायला हवी होती. मात्र महापालिका डोळेझाक करत असल्याने शहरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका मात्र दिवाळीत कचºयाचे प्रमाण वाढल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, एरव्ही ५०० टन रोज निघणारा कचरा दिवाळी सणात ६०० टनावर गेला आहे.

१०० टनाने कचरा वाढल्याने सफाई कामगार आणि वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे मुख्य कारण आहे. शिवाय सुट्टीनिमित्त कामगारांच्या रजांचा परिणाम कामावर झाला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही काही गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचेही कारण शहरात कचरा साचण्यामागे असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांमधून मात्र महापालिकेचा हा खोटारडेपणा असून शहरातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची तातडीची गरज असल्याचे म्हटले जात आहे. कचरा वर्गीकरण स्वत: पालिका आणि लोकप्रतिनिधीही करत नाहीत. कंत्राटी कामगारांची संख्या कमी असून आहेत ते प्रामाणिकपणे काम करत नसल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक