शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:17 IST

प्रशासन म्हणते, कचरा वाढला

मीरा रोड : ऐन सणासुदीला शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर दिवाळीत कचºयाचे वाढलेले प्रमाण तसेच कचºयाचे वर्गीकरण करून नागरिक देत नसल्याने कचरा उचलला गेला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.मीरा- भाईंदरमध्ये दिवाळीच्या सणादरम्यान ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचून असल्याचे दिसत आहे. कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधी पसरून त्यावर घुशी, भटकी जनावरे आदींचे प्रमाण वाढत आहे. भर रस्ता वा नाक्यावर साचलेल्या कचºयाच्या ढीगांमुळे नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे.

सणाच्यावेळी तरी शहरात स्वच्छता असायला हवी होती. मात्र महापालिका डोळेझाक करत असल्याने शहरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका मात्र दिवाळीत कचºयाचे प्रमाण वाढल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, एरव्ही ५०० टन रोज निघणारा कचरा दिवाळी सणात ६०० टनावर गेला आहे.

१०० टनाने कचरा वाढल्याने सफाई कामगार आणि वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे मुख्य कारण आहे. शिवाय सुट्टीनिमित्त कामगारांच्या रजांचा परिणाम कामावर झाला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही काही गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचेही कारण शहरात कचरा साचण्यामागे असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांमधून मात्र महापालिकेचा हा खोटारडेपणा असून शहरातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची तातडीची गरज असल्याचे म्हटले जात आहे. कचरा वर्गीकरण स्वत: पालिका आणि लोकप्रतिनिधीही करत नाहीत. कंत्राटी कामगारांची संख्या कमी असून आहेत ते प्रामाणिकपणे काम करत नसल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक