शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 23:54 IST

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

- वसंत भोईर

वाडा :  ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. अशीच अवस्था वाडा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी लोकवस्ती असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक पाड्यांतील नागरिकांची झाली आहे. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्याची फक्त आश्वासने मिळालेली आहेत. प्रत्यक्षात आश्वासनांची कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांना होळीनंतर पाऊस पडेपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकत रहावे लागत आहे.वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या चारही पाड्यांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील आदिवासींना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.वाडा तालुक्याला पाच नद्यांची देणगी असूनही या पाण्याचे नियोजन नसल्याने तालुक्यातील अनेक गाव-खेड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील नागरिकांचा पिण्याच्या, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तालुक्यात असलेल्या पाच नद्यांपैकी कुठेतरी एखादे मोठे धरण व्हावे, अशी मागणी तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी केलेली नाही.वाडा तालक्यातील भूमिपुत्र असलेले दामोदर शिंगडा हे २५ वर्षे खासदार होते, ल. का. दुमाडा हे पाच वर्षे खासदार होते, शंकर आबा गोवारी हे दहा वर्षे आमदार होते; तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा हे ३० वर्षे आमदार होते. यामधील सहा वर्षे ते आदिवासी विकासमंत्रीही होते. वाडा तालुक्याला सध्या दौलत दरोडा, सुनील भुसारा, शांताराम मोरे असे तीन आमदार असताना अनेक गावांमधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल, तर यासारखे दुर्दैव ते कोणते? असा सवाल आदिवासी उपस्थित करू लागले आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असल्याने त्यांचा रोजगार बुडतो.- गणपत दोडे, माजी सरपंच,ओगदा ग्रामपंचायत

पाणीटंचाई असलेल्या ओगदा व तुसे परिसरातील काही पाड्यातील नागरिकांची टँकर मागणी आलेली आहे. लवकरच येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- विनोद गुजर, पाणीपुरवठा विभाग,पंचायत समिती, वाडा.

टॅग्स :Waterपाणीpalgharपालघर