शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन करणा-यांना हवे जॅकेट, ठोस मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:56 IST

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.

बिर्लागेट : पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे विसर्जनस्थळी होणारे अपघातही घटले आहेत. मात्र, शहरांतील नैसर्गिक तलाव, सार्वजनिक विहिरी, खाडीकिनारी येथे आजही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून तरुण विसर्जन करण्यासाठी येतात. प्रशासनाकडून त्यांना जीवरक्षक जॅकेट, विमा कवच अथवा मानधनही मिळत नाही. या सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.गणेशोत्सव काळातील होणारे जल व ध्वनि प्रदूषण टाळण्याठी केडीएमसी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विसर्जनासाठी केडीएमसीने महापालिका हद्दीत कृत्रिम तलाव आणि प्लस्टिकच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात या तलावांमध्ये विसर्जन झाले. विसर्जनासाठी येथे वीजपुरवठ्या जनरेटर व्हॅन, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दलाचे जवान, गोताखोर तसेच भाविकांना आरती करण्यासाठी मंडपात टेबलची व्यवस्थाही करून दिली जात आहे. मात्र, नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी या सुविधा असल्या तरी विसर्जन करणारे तरुण जीव धोक्यात घालून गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत.कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांत म्हारळ, वरप, कांबा गावांतील पाचवामैल, रायता, आपटी चोण येथील संगम, आणे भिसोळ येथे उल्हास व बारवी नदीकिनारी तसेच येथील गणेश घाटावर विसर्जन केले जाते. परंतु, नद्यांच्या पातळीचा अंदाज न आल्याने अनेक गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे अपघात रोखण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयाने नदीच्या काठावरील गावांतील पट्टीच्या पोहणाºया ८० ते १०० तरुणांची यादी तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी तयार केली होती. त्यात रायता येथील २२, गोवेली सात , कांबा व वरप प्रत्येकी १०,म्हारळ १५, टिटवाळा दोन , गुरवली व वासुंद्री येथील प्रत्येकी एक आणि कोळीवाडा येथील १० जण आहेत.ग्रामीण भागातील आदिवासी, कोळी, कातकरी तरुण पोहण्यात तरबेज आहेत. गावातील खाडीकिनारी, तलाव तसेच अन्य जलस्त्रोतांची खोली, त्यातील खचखळगे यांची पूर्ण माहिती त्यांना असते. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना विसर्जनासाठी बोलावले जाते. हे तरुण गणेशोत्सवात मिळणाºया या रोजगाराच्या शोधात कल्याण-डोंबिवली परिसरातही जातात. मात्र, प्रशासनाकडून लाइफ जॉकेट, ठोस मानधन किंवा विमाही उतरवला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा प्रथमच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन करणाºया कोळी तरुणांनाविमा उतरवत एक आदर्श घालून दिला आहे.दरम्यान, रायता येथील अश्वमेध प्रतिष्ठानने तहसीलदार व पोलीस प्रशासनाला विसर्जनावेळी नेहमीच सहकार्य केले आहे. संस्थेच्या सभासदांनी आपटी, रायते, गोवेली, मानिवली, वाघेरापाडा, पाचवामैल, वरप, कांबा, म्हारळ येथे विसर्जनस्थळावर प्रत्यक्ष मूर्तींचे विसर्जन, गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आदी कामे केली आहेत. अविनाश हरड, नरेश सुरोशे, तुषार पवार, सुदाम भोईर, रवींद्र सुरोशे, जगण देसले आदी तरु णांनी विसर्जनाच्या काळात बुडणाºयांचे जीव वाचवले. त्याची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक अर्चना त्यागी यांनी घेत या तरु णांचा सन्मान केला होता. परंतु, सध्या विसर्जनावेळी पोलिसांना विविध सामाजिक संस्था मदत करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव