शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन करणा-यांना हवे जॅकेट, ठोस मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:56 IST

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.

बिर्लागेट : पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे विसर्जनस्थळी होणारे अपघातही घटले आहेत. मात्र, शहरांतील नैसर्गिक तलाव, सार्वजनिक विहिरी, खाडीकिनारी येथे आजही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून तरुण विसर्जन करण्यासाठी येतात. प्रशासनाकडून त्यांना जीवरक्षक जॅकेट, विमा कवच अथवा मानधनही मिळत नाही. या सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.गणेशोत्सव काळातील होणारे जल व ध्वनि प्रदूषण टाळण्याठी केडीएमसी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विसर्जनासाठी केडीएमसीने महापालिका हद्दीत कृत्रिम तलाव आणि प्लस्टिकच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात या तलावांमध्ये विसर्जन झाले. विसर्जनासाठी येथे वीजपुरवठ्या जनरेटर व्हॅन, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दलाचे जवान, गोताखोर तसेच भाविकांना आरती करण्यासाठी मंडपात टेबलची व्यवस्थाही करून दिली जात आहे. मात्र, नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी या सुविधा असल्या तरी विसर्जन करणारे तरुण जीव धोक्यात घालून गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत.कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांत म्हारळ, वरप, कांबा गावांतील पाचवामैल, रायता, आपटी चोण येथील संगम, आणे भिसोळ येथे उल्हास व बारवी नदीकिनारी तसेच येथील गणेश घाटावर विसर्जन केले जाते. परंतु, नद्यांच्या पातळीचा अंदाज न आल्याने अनेक गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे अपघात रोखण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयाने नदीच्या काठावरील गावांतील पट्टीच्या पोहणाºया ८० ते १०० तरुणांची यादी तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी तयार केली होती. त्यात रायता येथील २२, गोवेली सात , कांबा व वरप प्रत्येकी १०,म्हारळ १५, टिटवाळा दोन , गुरवली व वासुंद्री येथील प्रत्येकी एक आणि कोळीवाडा येथील १० जण आहेत.ग्रामीण भागातील आदिवासी, कोळी, कातकरी तरुण पोहण्यात तरबेज आहेत. गावातील खाडीकिनारी, तलाव तसेच अन्य जलस्त्रोतांची खोली, त्यातील खचखळगे यांची पूर्ण माहिती त्यांना असते. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना विसर्जनासाठी बोलावले जाते. हे तरुण गणेशोत्सवात मिळणाºया या रोजगाराच्या शोधात कल्याण-डोंबिवली परिसरातही जातात. मात्र, प्रशासनाकडून लाइफ जॉकेट, ठोस मानधन किंवा विमाही उतरवला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा प्रथमच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन करणाºया कोळी तरुणांनाविमा उतरवत एक आदर्श घालून दिला आहे.दरम्यान, रायता येथील अश्वमेध प्रतिष्ठानने तहसीलदार व पोलीस प्रशासनाला विसर्जनावेळी नेहमीच सहकार्य केले आहे. संस्थेच्या सभासदांनी आपटी, रायते, गोवेली, मानिवली, वाघेरापाडा, पाचवामैल, वरप, कांबा, म्हारळ येथे विसर्जनस्थळावर प्रत्यक्ष मूर्तींचे विसर्जन, गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आदी कामे केली आहेत. अविनाश हरड, नरेश सुरोशे, तुषार पवार, सुदाम भोईर, रवींद्र सुरोशे, जगण देसले आदी तरु णांनी विसर्जनाच्या काळात बुडणाºयांचे जीव वाचवले. त्याची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक अर्चना त्यागी यांनी घेत या तरु णांचा सन्मान केला होता. परंतु, सध्या विसर्जनावेळी पोलिसांना विविध सामाजिक संस्था मदत करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव