शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

उड्डाणपुलावरील रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; अंबरनाथमधील वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:40 IST

आचारसंहिता, पावसामुळे काम रखडले, पालिकेकडून निधी मंजूर

पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूलावरील रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुका झाल्यावर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्याने ते काम करता आले नाही. त्यानंतर लागलीच विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने पुन्हा हे काम रखडले. आता आचारसंहिता संपल्यावर तरी किमान रस्ता दुरूस्ती सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र अजूनही हे काम सुरू न झाल्याने धोकादायक झालेल्या रस्त्याचा वापर नागरिकांना करावा लागत आहे.

अंबरनाथमधील काँक्रिटच्या रस्त्यांची चर्चा शहरभर असली तरी आता पाच महिन्यांपासून एकाच रस्त्याची चर्चा रंगली आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल आणि त्यावरील रस्ता हा गंभीर विषय झाला आहे. पावसात हा रस्ता पूर्ण खचला. हा रस्ता पालिकेसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. याच उड्डाणपुलाच्या रस्त्यावरुन राजकीय वादही निवडणूक काळात रंगला होता. असे असतानाही या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी विलंब होत आहे. मूळात या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी पालिकेने निधी मंजूर केला आहे. सोबत या रस्त्याचे काम करण्याचे आदेशही कंत्राटदाराला मे महिन्यातच दिले आहे. मात्र मे महिन्यानंतर लागलीच पावसाळा येत असल्याने या रस्त्याचे काम करण्यसाठी वाहतूक विभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाला. पावसात रस्ता करणे शक्य नसल्याने पुन्हा हा रस्ता रखडला. या आधीही मार्च महिन्यात या रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकला होता. आता त्यातून सुटका झाल्यावर पावसामुळे हा रस्ता अडकला. पावसातून सुटका होत नाही तो पुन्हा विधानसभेच्या आचारसंहितेत हा रस्ता पुन्हा अडकला. आचारसंहिता आणि पाऊस अशा दुहेरी कात्रीत हा रस्ता सापडल्याने या रस्त्याची वाताहात झाली. या रस्त्यावरील डांबरी थर निघून तो रस्ता आता पुलाच्या काँक्रिटच्या थरावर आला आहे. त्यातच पुलाचे खांब ज्या लोखंडी पट्टीने जोडले जातात तो जोडही कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे. रस्त्यावरील डांबरी भाग निघाल्याने जड वाहतुकीच्या गाड्या या पुलाला धोका निर्माण करू शकतात. त्यातच हा पूल ज्या भागात उभा आहे त्या भागातील नागरिकांनी पुलाच्या कॉलमभोवती अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुलाचे कॉलम सुरक्षित आहेत की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. या पुलाच्या कॉलमला संरक्षक थर उभारण्याची गरज या आधीच व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ते कामही अजून सुरु झालेले नाही. उड्डाणपुलाची अवस्था पाहिल्यास या ठिकाणी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पुलाचे स्लॅब एकमेकांना जोडणारी जी लोखंडी पट्टी आहे ती पट्टीही तुटल्याने त्या लोखंडी पट्टीचाही त्रास वाहनचालकांना होत आहे. तसेच हुतात्मा चौकातून येताना पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेला काँक्रिट नाला हाही वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.अधिकारी सुट्टूीवर असल्याने पालिकेचे कामकाज थंडया पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आता पालिका प्रशासन सतर्क नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर या पुलावरील रस्त्याची दुरुस्तीही पालिकेच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ठरत आहे. निवडणुकीचे कामकाज झाल्यावर सर्व अधिकारी हे सुट्टीवर असल्याने पालिकेचे कामकाज हे धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला वेग देण्याची आणि उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डे