शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:21 IST

नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात जिल्ह्णातील सहा महापालिकांनादेखील सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून दररोज कचरा घेण्यासाठी शहरभर धावणाऱ्या ५२७ घंटागाड्यांद्वारे नागरिकांना, महिलांना आणि युवकयुवतींना आॅडिओ क्लिप ऐकवली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत आहे.जिल्ह्णातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कमीतकमी ७० टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघांत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती करून ‘मतदान’ करण्यासाठी आवाहन करणारे उपक्रम हाती घेतले. याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिका प्रशासनासदेखील निवडणूक यंत्रणेने आदेश जारी करून ‘मतदान’ टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप उपक्रम दिले आहेत. यास अनुसरून रोज कचरा घेण्यासाठी गल्लीगल्लींत धावणाºया घंटागाड्यांवर स्पीकर लावले आहेत. या स्पीकरद्वारे नागरिकांना आॅडिओ कॅसेट ऐकवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे केला असल्याचे ‘मतदान’ जनजागृती स्वीप उपक्रमांच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले.शहरातील घराघरांतील कचरा गोळा करण्याच्या दैनंदिन कामासह महापालिकांच्या घंटागाड्या मतदारांना २९ एप्रिलच्या त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. या गाड्यांना लावलेल्या स्पीकरमधील मंजूळ आवाजासह गीतांच्या माध्यमातून ‘मतदान’ हक्क बजावण्याचे आवाहन महिलावर्गांसह परिवारातील नागरिकांना करत आहेत. यासाठी ठाणे शहरात सर्वाधिक १५० घंटागाड्या रोज सकाळ, दुपारच्या त्यांच्यावेळेत धावत आहेत. याखालोखाल कल्याण-डोंबिवली मनपाच्या शहरांमध्ये १४० घंटागाड्या मतदानाची जाणीव करून देत आहेत. याशिवाय, नवी मुंबईला ११९, अंबरनाथला ५६ भिवंडी, ५४ तर उल्हासनगर शहरात आठ घंटागाड्या धावत आहेत.>‘मतदान’ हक्काची जाणीव लोकचळवळ व्हावीगेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्णातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी अवघे ३८ टक्के म्हणजे अत्यल्प मतदान झाल्याची नोंद आहे. यापेक्षा एक टक्का जास्त अंबरनाथला ३९ टक्के फारच कमी मतदान झाल्याची नोंद आहे. यामुळे येथील ‘मतदान’ हक्काची जाणीव जनजागृतीऐवजी लोकचळवळ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे