शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मूलभूत साेयीसुविधा, विकास कामांची झाडाझडती

By सुरेश लोखंडे | Updated: July 19, 2024 17:52 IST

या झाडाझडतीत त्यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्यपुर्तीची जाणीव करून दिली.

सुरेश लोखंडे,ठाणे : जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील मुलभूत साेयी सुविधांसह विाकास कामांचा आढावा राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी घेऊन घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या झाडाझडतीत त्यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्यपुर्तीची जाणीव करून दिली.

येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियाेजनभवनमध्ये पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध कामांची झाडाझडती पंडीत यांनी घेऊन अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,अप्पर आदिवासी विकास आयुक्त दिपक मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे आदींसह संबंधित अधिकारी माेठ्यासंख्येने उपस्थित हाेते.

 भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला कलम २१ नुसार जगण्याच्या अधिकाराची हमी दिली आहे. कायद्यानुसार हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. या अधिकाराद्वारे प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा आहे. म्हणूनच समाजातील शेवटच्या व्यक्तीला त्याचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यासह आपली सर्वांची आहे. यासाठीच सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्यपूर्ती करावी, असे पंडित यांनी या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

 या बैठकीत प्रामुख्याने आदिवासी व कातकरी बांधवांशी निगडित आधार कार्ड, जॉब कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते, जातीचे दाखले, घराखालच्या जमिनी नावे करणे, वन दावे, वन अधिकारानुसार गावठाण दावे, ६ ते १४ वयोगटातील स्थलांतरित मुलांच्या यादीसह स्थलांतरित कुटुंबांची यादी, ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुले, सॅम-मॅमची मुले, कातकरी कुटुंबे, बेघर कातकरी कुटुंबे, दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या कुटुंबांची संख्या, आश्रम शाळेत दाखल मुलांची जातवारीनुसार संख्या, जन्म-मृत्यू नोंदी, गावातून, वाडीतून कायम स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची संख्या, मुक्त वेठबिगार कुटुंबे, आदींचा आढावा यावेळी घेऊन पंडीत यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फाेडला. समाजातील गरजू, वंचित, आदिम आदिवासी जमातीच्या घटकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हे आपले कर्तव्यच आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रामाणिकपणे झटून काम करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणे