शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

By धीरज परब | Updated: July 12, 2024 17:56 IST

ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा मुळे शहराचे वाटोळे होत असून भाईंदरच्या मुर्धा , राई व  मोर्वा गावातील नैर्सगिक खाड्यां मध्ये बेकायदा भराव करून बेकायदा बांधकामे केली गेल्याने तसेच पालिकेने प्रक्रिया न करताच मलमूत्र - सांडपाणी खाडीत बेकायदा सोडल्याने तिन्ही गावातील भूमिपुत्रांना विविध गंभीर समस्या भेडसावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

मुर्धा, राई, मोर्वा गावातील अनेक ग्रामस्थांच्या भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थाच्या वतीने अध्यक्ष अशोक पाटील , सचिव जागृती म्हात्रे सह धनेश्वर पाटील , नंदकुमार पाटील , राई गावपंच अध्यक्ष भगवान पाटील , आगरी एकता  मंडळाचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे , नंदकुमार भोईर , केसरीनाथ भोईर आदींनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना भेटून गावातील समस्यांचा पाढा मांडला .  शहरातील दुषित सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक खाडी पात्रांमध्ये सोडणे व कचरा टाकणे . खाडी पात्रांवर अनधिकृत माती भराव व अनधिकृत बांधकाम सातत्याने होत असल्यामुळे नैसर्गिक खाडी पात्रे बुजत गेली व अरुंद होत चालली आहेत . मलमूत्र - सांडपाणीचा गाळ व कचरा मुळे खाडीपात्रांमध्ये तीवरांची झपाट्याने वाढ होत गेली आहे आणि नैसर्गिक खाडीपात्रे बुजत गेली. 

दूषित सांडपाण्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी दूषित झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शिलोत्र्यांचा मीठ उत्पादनाचा व्यवसाय बंद होत चालला आहे . खाडीमात्रांमध्ये ग्रामस्थांचा मासेमारीचा व्यवसाय बंद पडला आहे. भात शेतीमध्ये साचणार्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा बंद झाल्याने भातशेती नापीक झाली आहे . पावसाळ्यात गावांमध्ये पाणी साचून गटाराचे दूषित सांडपाणी मधून ये-जा करावी लागते.  दलदल व दुर्गंधी पसरली आहे . 

खाडीपात्रांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तात्काळ हटवून भराव काढून टाकून खाडी पात्र मोकळी आणि रुंद करावीत . बेकायदा भराव आणि अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या  सुविधा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे . खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करून जॉगिंग आदी सुविधा कराव्यात .  खाडी पात्रांमध्ये सोडले जाणारे बेकायदा सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे तसेच मलनिःसारण प्रकल्प उभारावा अशी मागणी महापालिका आयुक्तांना केल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सांगितले. 

 ह्या आधी देखील खाडी पात्रातील अतिक्रमणाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी करून देखील त्यावर कारवाई केली गेली नाही उलट मोठ्या प्रमाणात भराव आणि बेकायदा बांधकामे वाढली असल्याचा आरोप देखील संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला . दरम्यान आयुक्तांनी पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे व पाहणी नंतर कारवाईचे नियोजन केले जाईल असे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर