शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

By धीरज परब | Updated: July 12, 2024 17:56 IST

ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा मुळे शहराचे वाटोळे होत असून भाईंदरच्या मुर्धा , राई व  मोर्वा गावातील नैर्सगिक खाड्यां मध्ये बेकायदा भराव करून बेकायदा बांधकामे केली गेल्याने तसेच पालिकेने प्रक्रिया न करताच मलमूत्र - सांडपाणी खाडीत बेकायदा सोडल्याने तिन्ही गावातील भूमिपुत्रांना विविध गंभीर समस्या भेडसावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

मुर्धा, राई, मोर्वा गावातील अनेक ग्रामस्थांच्या भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थाच्या वतीने अध्यक्ष अशोक पाटील , सचिव जागृती म्हात्रे सह धनेश्वर पाटील , नंदकुमार पाटील , राई गावपंच अध्यक्ष भगवान पाटील , आगरी एकता  मंडळाचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे , नंदकुमार भोईर , केसरीनाथ भोईर आदींनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना भेटून गावातील समस्यांचा पाढा मांडला .  शहरातील दुषित सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक खाडी पात्रांमध्ये सोडणे व कचरा टाकणे . खाडी पात्रांवर अनधिकृत माती भराव व अनधिकृत बांधकाम सातत्याने होत असल्यामुळे नैसर्गिक खाडी पात्रे बुजत गेली व अरुंद होत चालली आहेत . मलमूत्र - सांडपाणीचा गाळ व कचरा मुळे खाडीपात्रांमध्ये तीवरांची झपाट्याने वाढ होत गेली आहे आणि नैसर्गिक खाडीपात्रे बुजत गेली. 

दूषित सांडपाण्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी दूषित झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शिलोत्र्यांचा मीठ उत्पादनाचा व्यवसाय बंद होत चालला आहे . खाडीमात्रांमध्ये ग्रामस्थांचा मासेमारीचा व्यवसाय बंद पडला आहे. भात शेतीमध्ये साचणार्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा बंद झाल्याने भातशेती नापीक झाली आहे . पावसाळ्यात गावांमध्ये पाणी साचून गटाराचे दूषित सांडपाणी मधून ये-जा करावी लागते.  दलदल व दुर्गंधी पसरली आहे . 

खाडीपात्रांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तात्काळ हटवून भराव काढून टाकून खाडी पात्र मोकळी आणि रुंद करावीत . बेकायदा भराव आणि अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या  सुविधा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे . खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करून जॉगिंग आदी सुविधा कराव्यात .  खाडी पात्रांमध्ये सोडले जाणारे बेकायदा सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे तसेच मलनिःसारण प्रकल्प उभारावा अशी मागणी महापालिका आयुक्तांना केल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सांगितले. 

 ह्या आधी देखील खाडी पात्रातील अतिक्रमणाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी करून देखील त्यावर कारवाई केली गेली नाही उलट मोठ्या प्रमाणात भराव आणि बेकायदा बांधकामे वाढली असल्याचा आरोप देखील संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला . दरम्यान आयुक्तांनी पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे व पाहणी नंतर कारवाईचे नियोजन केले जाईल असे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर