शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

By धीरज परब | Updated: July 12, 2024 17:56 IST

ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा मुळे शहराचे वाटोळे होत असून भाईंदरच्या मुर्धा , राई व  मोर्वा गावातील नैर्सगिक खाड्यां मध्ये बेकायदा भराव करून बेकायदा बांधकामे केली गेल्याने तसेच पालिकेने प्रक्रिया न करताच मलमूत्र - सांडपाणी खाडीत बेकायदा सोडल्याने तिन्ही गावातील भूमिपुत्रांना विविध गंभीर समस्या भेडसावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

मुर्धा, राई, मोर्वा गावातील अनेक ग्रामस्थांच्या भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थाच्या वतीने अध्यक्ष अशोक पाटील , सचिव जागृती म्हात्रे सह धनेश्वर पाटील , नंदकुमार पाटील , राई गावपंच अध्यक्ष भगवान पाटील , आगरी एकता  मंडळाचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे , नंदकुमार भोईर , केसरीनाथ भोईर आदींनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना भेटून गावातील समस्यांचा पाढा मांडला .  शहरातील दुषित सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक खाडी पात्रांमध्ये सोडणे व कचरा टाकणे . खाडी पात्रांवर अनधिकृत माती भराव व अनधिकृत बांधकाम सातत्याने होत असल्यामुळे नैसर्गिक खाडी पात्रे बुजत गेली व अरुंद होत चालली आहेत . मलमूत्र - सांडपाणीचा गाळ व कचरा मुळे खाडीपात्रांमध्ये तीवरांची झपाट्याने वाढ होत गेली आहे आणि नैसर्गिक खाडीपात्रे बुजत गेली. 

दूषित सांडपाण्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी दूषित झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शिलोत्र्यांचा मीठ उत्पादनाचा व्यवसाय बंद होत चालला आहे . खाडीमात्रांमध्ये ग्रामस्थांचा मासेमारीचा व्यवसाय बंद पडला आहे. भात शेतीमध्ये साचणार्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा बंद झाल्याने भातशेती नापीक झाली आहे . पावसाळ्यात गावांमध्ये पाणी साचून गटाराचे दूषित सांडपाणी मधून ये-जा करावी लागते.  दलदल व दुर्गंधी पसरली आहे . 

खाडीपात्रांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तात्काळ हटवून भराव काढून टाकून खाडी पात्र मोकळी आणि रुंद करावीत . बेकायदा भराव आणि अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या  सुविधा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे . खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करून जॉगिंग आदी सुविधा कराव्यात .  खाडी पात्रांमध्ये सोडले जाणारे बेकायदा सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे तसेच मलनिःसारण प्रकल्प उभारावा अशी मागणी महापालिका आयुक्तांना केल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सांगितले. 

 ह्या आधी देखील खाडी पात्रातील अतिक्रमणाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी करून देखील त्यावर कारवाई केली गेली नाही उलट मोठ्या प्रमाणात भराव आणि बेकायदा बांधकामे वाढली असल्याचा आरोप देखील संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला . दरम्यान आयुक्तांनी पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे व पाहणी नंतर कारवाईचे नियोजन केले जाईल असे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर