शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भिवंडीतील काटई येथील अनधिकृत केमिकल गोदामांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

By नितीन पंडित | Updated: July 16, 2024 20:23 IST

अनधिकृत केमिकल गोदामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरालगत असलेल्या काटे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत केमिकल साठवणूक होत असल्याने या अनधिकृत केमिकल गोदामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या केमिकल साठ्यांना आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल करत या अनधिकृत केमिकल गोदामांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी काटई ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी मंगळवारी केली आहे.

भिवंडीतील राहनाळ, पूर्णा, काल्हेर आदी परिसरात केमिकल गोदामांना आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर येथील केमिकल गोदामांवर कारवाई केल्यानंतर केमिकल माफीयांनी आपले बस्तान शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीत बसवले आहे. काटई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत केमिकल साठ्याच्या गोदामामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेक वेळा केमिकलची वाहतूक करताना रस्त्यावर केमिकल पडल्याने नागरिकांना इजा होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.        गोदामात साठवलेले हे केमिकल इतके घटक आहे की या गोदामात काम करणाऱ्या कामगारांचे हात देखील केमिकलने भाजले असल्याची माहिती समोर आली आहे.नागरिकांच्या जीवाला धोका असलेल्या या घातक केमिकल गोदामांवर लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी काटई ग्राम पंचायतीच्या सरपंच छाया पाटील यांच्यासह माजी सरपंच शरद पाटील व भावेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी