शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

असंख्य चित्रपटांतून विजू मामांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलंय : किरण नाकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:11 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आठवण विजू मामांची... या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर आठवण विजू मामांचीअसंख्य चित्रपटांतून विजू मामांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलंय : किरण नाकतीश्रीमंत दामोदर पंत व मोरूची मावशी या नाटकातील नाट्यप्रवेश कट्ट्यावर सादर

ठाणे :  विजय चव्हाण यांनी अजरामर केलेल्या असंख्य भूमिका त्यांच्यातील एका जबरदस्त अभिनेत्याची ओळख करून देतात. तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत ,मोरूची मावशी अशा कित्येक नाटकांतून आपल्या व्यक्तीरेखेची छाप रसिकांवर सोडली. मोरूच्या मावशीने तर लोकांना अक्षरशः वेड लावले. माहेरची साडी, पछाडलेला, गोतावळा, झपाटलेला, भरत आला परत, जत्रा अशा असंख्य चित्रपटांतून विजू मामांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलंय. असा टायमिंगचा बादशाह होणे नाही असे मत किरण नाकती यांनी अभिनय कट्ट्यावर व्यक्त केले. 

    या दिग्गज अभिनेत्याला मानाचा मुजरा करण्यासाठी अभिनय कट्टा सरसावला व कट्टा  क्र ३९२ म्हणजेच आठवण विजू मामांची या कट्ट्याला सुरवात झाली. सुप्रसिद्ध जेष्ठ विनोदी नाट्य चित्रपट अभेनेते विजय चव्हाण यांचे नुकतेच दीर्घशा आजाराने निधन झाले. विजय चव्हाण म्हणजेच रंगभूमी व चित्रपट सृष्टीचे लाडके विजू मामा. महान अभिनेत्या प्रमाणेच विजू मामा महान व्यक्ती होते . अतिशय साधी राहणीमान व आपल्या सर्वच सहकलाकारांसोबत मग तो ज्येष्ठ कलाकार असो किंवा आजच्या तरुण पिढीतला असो सर्वांसोबत मामा नम्रपणे वागत. मिश्किल स्वभाव व दिलदार व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती असेही नाकती पुढे म्हणाले. श्रीमंत दामोदर पंत व मोरूची मावशी या दोन्ही नाटकातील निवडक नाट्यप्रवेश अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केले. श्रीमंत दामोदर पंत मध्ये सहदेव कोळंबकर, परेश दळवी, मौसमी घाणेकर यांनी काम केले. तसेच मोरूची मावशीच्या सादरीकरणामध्ये सुरज परब, वैभव चव्हाण, कुंदन भोसले, ओमकार मराठे, रोहिणी थोरात, साक्षी महाडिक सहदेव साळकर या कट्टयाच्या कलाकारांनी सहभाग घेतला. विजू मामांच्या कलाकृतीमधून अभिनय कट्टयातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. विजय चव्हाण यांचे चिरंजीव वरद चव्हाण यांना चित्रीकरणामुळे हजेरी लावता आली नाही. परंतु त्यांनी त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबांना नेहमी हसायला व समोरच्याला हसत ठेवायला आवडायचं म्हणूनच आपण अभिनय कट्टयाच्या माध्यमातून जे करताय ती खरी बाबांना श्रद्धांजली आहे असं बोलून त्यांनी अभिनय कट्टयाचे आभार मानले. या कार्यक्रमासोबतच अभिनय कट्ट्यावर “कार्टी नाटकात घुसली” या नवीन नाटकाचा परिसंवाद पार पडला. एकूण नऊ इरसाल विनोदी तरुण कलाकारांना घेऊन कौतुक शिरोडकर यांच्या फार्सिकल लेखणीतून व मछिंद्र कदम या नव्या दमाच्या होतकरू दिग्दर्शनाकातून अभिनय कट्ट्याचा कलाकार गणेश गायकवाड याची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या या नाटकाचा एक विनोदी नाट्य प्रवेश कट्ट्यावर सादर केला व उपस्थित रसिकांनी विनोदाचा आस्वाद घेतला. मनोज चाळके, प्रवीण आंग्रे, गणेश गायकवाड, चेतन गडकरी, तेजस घाडीगावकर, कृष्णा दळवी, प्रशांत मनोरे, हर्षद शेटे, रविना भायदे या सर्वच कलाकारांनी बँकेतील कर्मचाऱ्याचे नाटक बसवतानाची धडपड गोंधळ व त्यातून होणार विनोद व एका हौशी कलाकाराची व्यथा मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय. असं त्या सादरीकरणातून व परिसंवादातून लक्षात आले. या कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई