शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ‘सेवा नाही, तर कर कशाला'  या आंदोलनावर जागरुक नागरीक ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 19:34 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गेल्या 20 वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार 2 हजार 497 कोटी रुपये खर्च विविध सेवा सुविधा पुरविण्यावर झाला आहे. प्रत्यक्षात नागरीकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सेवा नाही तर कर ही नाही अशी भूमिका घेत जागरुक नागरिक एकवटले आहेत.

कल्याण, दि. 17 - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गेल्या 20 वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार 2 हजार 497 कोटी रुपये खर्च विविध सेवा सुविधा पुरविण्यावर झाला आहे. प्रत्यक्षात नागरीकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सेवा नाही तर कर ही नाही अशी भूमिका घेत जागरुक नागरिक एकवटले आहे. त्यांच्या वतीने येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी आंदोलन केले जाणार आहे. या सगळ्य़ा आंदोलनात माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणोकर यांनी पुढाकार घेतला आहे. घाणोकर यांनी महापालिकेने केलेल्या खर्चाची माहिती, माहितीच्या अधिकारात उघड केली आहे. त्यांनी जागरुक नागरीकांना एकत्रित करण्यासाठी व्हॉटसअपवर आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जागरुक नागरीकांची काल एक बैठक पार  पडली. या बैठकीला माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मनोज कुलकर्णी, सुलेख डोन, शैलेश जोशी, मुन्ना पांडे, योगेश दळवी, किशोर जैन, विकास करुडूसकर, माजी नगरसेवक इफ्तेखार खान, उमेश बोरगांवकर आदी उपस्थित होते. या नागरीक फोरमचे नाव अद्याप ठरविलेले नाही. लवकरच त्याचे नाव ठरविले जाईल. प्रशासनावर नागरीक सुविधा पुरविण्यासाठी एक दबाव तयार केला जाईल असे घाणोकर यांनी यावेळी सांगितले. डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. कल्याणमधील आधारवाडी कचरा डेपोचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. पाणी पुरवठय़ावर 60 कोटी रुपये खर्च झालेले आहे. तरी ही अनेक भागात पाण्याचा प्रश्न आहे. ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पार्किगचा प्रश्न आणि विशेष करुन कोटय़ावधीचे बजेट असलेल्या महापालिकेला साधी सिग्नल यंत्रणा उभारता आलेली नाही. फेरीवाल्यांनी रस्ते

टॅग्स :Governmentसरकार