शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महासभेत असंवेदनशीलतेचे दर्शन, खड्ड्यांवर चर्चेऐवजी नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:56 IST

कल्याण परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले असताना मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी खड्ड्यांवर चर्चा करण्याएवजी गोंधळ घातला.

कल्याण : कल्याण परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले असताना मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी खड्ड्यांवर चर्चा करण्याएवजी गोंधळ घातला. त्यामुळे संवेदनशीलतेचे दर्शन घडले. चिखलात माखून आलेल्या अपक्ष नगरसेवकाने सुरुवातीला गोंधळ घातला. तर, सत्ताधारी भाजपाच्या उपमहापौर व नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, मनसेच्या गटनेत्याने महापौरांसमोरील राजदंड पळविला. या प्रचंड गोंधळामुळे महापौरांनी सभा तहकूब केली. सत्ताधारी शिवसेना-भाजपाला खड्ड्यांच्या गंभीर मुद्यावर चर्चाच करायची नसल्याने त्यांनी नौटंकी करून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्ष मनसेने केला आहे.अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे चिखलात माखलेल्या अवस्थेत महासभेत आले. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी त्यांना असे करू नका, असे समजावले. सुरक्षारक्षकांनीही त्यांना महासभेत जाण्यापासून मज्जाव केला. मात्र तानकी यांनी त्यांचा विरोध न जुमानता सभागृहात प्रवेश केला. सभागृहातही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीला लावून धरली. त्यावर सचिवांनी श्रद्धांजलीचे प्रस्ताव अनेकांनी मांडले आहेत, असे सांगितले. मात्र, त्यांचे काही एक ऐकून न घेता तानकी जोरात बोलत होते. महासभेने पाच मृतांना श्रद्धांजली वाहिली. सभेच्या सुरुवातीस भाजपा उपमहापौर उपेक्षा भोईर व अन्य सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत ठिय्या धरला. त्यात तानकीही सहभागी झाले. तेव्हा हे आंदोलन करू नका जागेवर बसा असे, आदेश महापौर विनीता राणे यांनी दिले. मात्र, सभेत गदारोळ सुरू झाला.भोईर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी व दीपेश म्हात्रे यांनी केली. भाजपाचे स्थायी समिती सभापती राहुल दामले हे आंदोलनात सहभागी न होता मागे उभे होते. ‘स्थायी समिती सभापती काम करीत नाही. खड्डे बुजविले गेले नाहीत असाच या आंदोलनाचा अर्थ होतो. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने करावी,’ असा उपरोधिक टोला शेट्टी यांनी लगावला. या गदारोळात मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी राजदंड पळवून बाहेर पळ काढला. दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या हातातील राजदंड पुन्हा आणून जागेवर ठेवला. महापौरांनी सभा तहकूब करत राष्ट्रगीत सुरू केले.>महापौरांचे कोणीच ऐकत नव्हतेमहापौरांचे कोणी ऐकतच नव्हते. त्यामुळे त्या राजदंडाचा काय उपयोग. त्यामुळे महापौरांसमोरील राजदंड पळविला. शिवसेना-भाजपाची नौटंकी रोखण्यासाठी हे कृत्य केले. हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असे आव्हानही मनसेचे गटनेते भोईर यांनी यांनी शिवसेनेला दिले आहे.कातडी वाचवण्याचा प्रयत्न?विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले की, शिवसेना-भाजपला रस्त्यावरील खड्डे प्रश्नावर काडीमात्र गांभीर्य नाही. सभेतील गोंधळ थांबविण्यासाठी राष्ट्रगीताचा आयुधाचा वापर करून ते सुरू करत सभा संपविली. ही लोकशाहीची पायमल्ली आहे. खड्ड्यामुळे लोकांचे जीव गेले. त्यावर शिवसेना-भाजपा राजकारण करत आहे. त्यांनी कातडी वाचवण्याचा प्रयत्न यातून केला असला तरी पुढच्या सभेत विरोधी पक्ष त्यांना सोडणार नाही.>निलंबनाच्या चर्चेऐवजी बगलशिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर म्हणाले, भाजपा उपमहापौरांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी ठिय्या दिला. भाजपाचे तीन आमदार व एक राज्यमंत्री असून जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आंदोलन केले. महासभेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा विषय होता. त्याला बगल देण्यासाठी भाजपाने हे आंदोलन मुद्दामून केले आहे. त्यामुळे भाजपाचा निषेध व्यक्त केला आहे.>आरोप तथ्यहीनउपमहापौर भोईर यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठिय्या दिला होता. त्यामुळे आमचा उद्देश प्रामाणिक होता. त्यात कोणतीही स्टंटबाजी नव्हती. त्यामुळे विरोधकांचा आरोपात काही तथ्य नाही.कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी ४८३ खड्ड्यांपैकी ३६९ खड्डे बुजविल्याची माहिती दिली आहे. हे खड्डे १६ किलोमीटरच्या अंतरात होेते. बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १६२९ चौरस मीटर इतके होते. काँक्रिट रस्त्यावरील १२५ चौरस मीटर खड्ड्यांची तर, आतापर्यंत चार दिवसात ३५ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका