शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आज कल्याणच्या स्मशानात 'एक रात्र भुतांची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:27 IST

गटारी अमावस्येनिमित्त विशेष कार्यक्रम

- अनिकेत घमंडीडोंबिवली: दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी भारतीने कल्याणमध्ये 'एक रात्र भुतांची' या गटारी पिकनिकचे आयोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थी भारतीचे सदस्य आजची म्हणजेच गटारी अमावस्येची रात्र नांदगाव स्मशानात काढणार आहेत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. आपण कळत नकळत अनेक अंधश्रद्धा जोपासतो. त्या दूर होण्याची आवश्यकता असल्याचं संघटनेच्या राज्य विद्यापीठ अध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितलं. 'देशात अंधश्रद्धेने ज्या पद्धतीने थैमान घातलं आहे ते फार भयंकर आहे. आज खूप सहज एखादा भोंदूबाबा एखाद्या सुशिक्षिताला भविष्य सांगण्याच्या नावाखाली लुबाडतो. भोंदूबाबांसाठी हवी तेवढी किंमत मोजायलादेखील सुशिक्षित मंडळीही सहज तयार होतात. अंधश्रद्धेची छोटी मोठी उदाहरणं आपण आपल्याच घरात रोज पाहत असतो. मांजर आडवी गेली की काम होत नाही, उंबरठ्यावर शिंकू नये, शनिवारी नखं कापू नये अशा बऱ्याच गोष्टी असतात. जे आपण पाहतो आणि पटत नसूनही काहीच बोलत नाही. अंधश्रद्धा दूर करण्याची सुरुवात इथून झाली पाहिजे', असे मुधाने म्हणाल्या.अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असं आपण ऐकत असतो. त्यामुळे अमावस्येच्या रात्रीच स्मशानात जाऊन पूर्ण रात्र तेथे काढणार आणि भुतांनी आम्हाला भेटायला यावे यासाठी 'भुता भुता ये रे, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे' या मुलांनी तयार केलेल्या गाण्यामार्फत भुतांना आवाहन करणार आहोत', असे सिद्धार्थ कांबळे यांनी सांगितले.अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि निर्भय होऊन जातात. वेगवेगळ्या खेळांमार्फत अंधश्रद्धेची पोलखोल केली जाते. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टास्क दिले जातात. चळवळींच्या गाण्यांची मैफल भरते. चिकनची मेजवानी असते. तर ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष आरती गुप्ता यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याण