शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:25 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चहुबाजूने शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी शंभर मीटर परिसरात कलम १४४ ( २) अन्वये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा या १३ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.या १३ विधानसभा क्षेत्र कार्यालयांच्या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आदींना बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्र म घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यालयांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नामनिर्देशन अर्ज दाखल करणारा उमेदवार व त्याच्यासोबत चार व्यक्तींना प्रवेश देण्यात येणारआहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाºया उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या चहूबाजूकडील परिसराच्या आत फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.तीनपेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश ७ आॅक्टोबर मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याने कार्यालयातील गोंधळाचे वातावरण टाळता येणार आहे.खर्चाच्या तक्रारीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकाना भेटून संबंधित उमेदवारांच्या खर्चाबाबत तक्रार करणे शक्य होणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भेटता येणार आहे.निरीक्षकांच्या वास्तव्याचे ठिकाणी नारिकांना भेटून तक्रार करता येणार आहे. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निवडणूक खर्च निरीक्षक विवेकानंद यांना विद्युत पारेषण गेस्ट हाऊस, तळमजला, पडघा येथे दिलेल्या वेळेत भेटता येणार आहे. शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाची तक्रार निरीक्षक आशिषचंद्र मोहंती यांना त्यांच्या सेंच्युरी रेयॉन गेस्ट हाऊस, वसंत विहार, कल्याण येथील कार्यालयात करण्याची परवानगी दिली आहे.अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांच्या तक्रारीसाठी खर्च निरीक्षक एस.आर. कौशिक यांना आयुध निर्माणी गेस्ट हाऊस, अंबरनाथ येथील कक्ष क्रमांक ५ व ६ येथे जावून भेटता येणार आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे या मतदारसंघांतील तक्रारीसाठी शिवस्वरूप सिंग, यांना कक्ष क्र .४, डोंबिवली जिमखाना, डोंबिवली येथे संपर्क साधता येणार आहे. मीरा- भार्इंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निरीक्षक उमेश पाठक यांच्याकडे कक्ष क्र .२७, रेमंड गेस्ट हाऊस येथे व रूम नं.२, सूर्या, शासकीय विश्रामगृह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (प.) येथे करता येईल. मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदारसंघांसाठी तक्रार के. रमेश यांच्याकडे नागरिकांना रूम नं.४, सिडको गेस्ट हाऊस, किल्ले गावठान बेलापूर, नवी मुंबइ, येथे जावून दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान करता येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019