शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शहापूरमध्ये महामार्गासाठी जाणार २७ हजार ४६३ झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:51 IST

मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांतील सुमारे २७,४६३ झाडांचा बळी घेणार आहे.

- नारायण जाधव ठाणे : एकीकडे राज्य शासनाने शतकोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असताना दुसरीकडे मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांतील सुमारे २७,४६३ झाडांचा बळी घेणार आहे.ठाणे हा राज्यातील वनाच्छादित जिल्ह्यांपैकी एक असून मुंबईनजीकचा जिल्हा तो म्हणून तो ओळखला जातो. राजधानी मुंबईच्या जवळ असल्याने या जिल्ह्यातील शेतजमिनीसह वनजमीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असून त्यात येत्या काळात अनेक नियमांना डावलून लाखो झाडांचा बळी जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातून जेएनपीटी-दिल्ली डेडिकेट फे्रट कॉरिडोर, मुंबई-बडोदरा महामार्ग, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह शाई, काळू ही धरणे आणि संजय गांधी उद्यानातून जाणारा ठाणे-बोरिवली मार्ग व विविध इतर छोट्यामोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर, नवी मुंबई या शहरांत त्या महापालिकांसह एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि एमआयडीसीकडून अनेक प्रकल्प नजीकच्या काळात आकार घेत आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लाखो झाडांचा बळी जाणार आहे. कारण, यातील बहुतेक प्रकल्प जंगलपट्ट्यासह आरक्षित वनांतून जाणार आहेत. त्यांच्या उभारणीसाठी ही वृक्षकत्तल करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडे धरण प्रकल्पांसह बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदरा महामार्ग व विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये बाधित होणार आहेत.आता समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात शहापूर तालुक्यातील खर्डी येथील २४९९, धसई- ३८८८, सरळांबे, अर्जुनाली, लाहे, खुटाडी, अंबजे या गावांतील ४४३१, शेरे २२०४, शाई ४९४०, बिरवाडी ५६७८ असा वृक्षांचा बळी जाणार आहे. फळेगाव, उशीद, नडगाव, उटने या गावांतील ३८२३ झाडांच्या कत्तलीसाठी निविदा मागवल्या आहेत.>कायदा धाब्यावर,वन्यप्राण्यांचे नुकसानही गुलदस्त्यातएवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करताना वनविकास महामंडळानेच वृक्षतोडीसंदर्भातील कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. यात कोणती व कशा प्रकारची झाडे जाणार आहेत, यात दुर्मीळ, अतिदुर्मीळ प्रजाती किती आहेत, त्यांचे टॅगिंग केले आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, यातील किती झाडांचे पुनर्रोपण करणार, कुठे आणि कसे करणार, हे गुलदस्त्यात आहे. या वृक्षतोडीमुळे त्यात्या परिसरातील जंगलसंपत्तीसह वन्यप्राण्यांची किती व कशा प्रकारे हानी होणार आहे, त्यांच्या जीवनमानावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, याबाबतही लपाछपी खेळण्यात आली आहे.