शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेससाठी तारेवरची कसरत

ठाणे : लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचे नाव घोषित झाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. यावेळी लोकशाही आघाडीचाच उमेदवार बाजी मारेल, असा दावा राष्ट्रवादीने केला असून मागील निवडणुकीच्या तुलनेत दुपटीने मते मिळतील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात कोणाला किती मते द्यायची, हे मतदारराजाच निश्चित करणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून हा बालेकिल्ला हिरावून घेण्यात राष्टÑवादीला यश आले होते; परंतु हे यश त्यांना जास्त काळ टिकवता आले नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे संजीव नाईक विरुद्ध शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात सामना रंगला होता. त्यावेळी मोदीलाटेत विचारे यांनी शिवसेनेचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला. २०१९ मध्ये राष्टÑवादीकडून नाईक कुटुंबातीलच व्यक्तीच निवडणूक लढवेल, अशी अपेक्षा होती; परंतु नाईक कुटुंबाने निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राजन विचारे हे विद्यमान खासदार असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परांजपे हे ठाण्यात वास्तव्यास असले, तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ तसा नवाच आहे.ऐनवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आल्याने त्यांना संपूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नाईक कुटुंबातील एखादा उमेदवार असता, तर कदाचित येथे चुरशीची लढत झाली असती, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या कामांची पोचपावती सुज्ञ मतदार देईल, असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती राष्टÑवादी करेल, असा दावा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी केला आहे.ठाणे हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने दोन लाख ८५ हजार मतांनी सरशी मिळवली होती. यावेळी ती दुप्पट असेल. मतदारांना माहीत आहे, पाच वर्षांत कुणी काम केले आणि कुणी नाही केले. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.- राजन विचारे,खासदार, शिवसेनापक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्ह्यातील ज्येष्ठांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती होईल आणि आघाडीचा विजय होईल.- आनंद परांजपे, राष्टÑवादीशिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस