शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

ज्येष्ठ लेखक बाबुराव सरनाईक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:39 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार असलेले पत्रकार, लेखक बाबुराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.

ठाणे : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार असलेले पत्रकार, लेखक बाबुराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात विलास आणि आ. प्रताप सरनाईक ही दोन मुले, मुलगी प्रतिभा, सून नगरसेविका परिषा तसेच विहंग आणि नगरसेवक पूर्वेश ही नातवंडे असा परिवार आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले एक लढवय्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंचा एक साक्षीदार हरपल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. शरीराने थकलेल्या बाबूजींचे विचार आणि मन मात्र तरु ण होते.‘हा कुंभ अमृताचा’ हे आत्मचरित्र आणि आचार्य अत्रेंच्या जीवनावर आधारित ‘तो एक सूर्य होता’ तसेच ‘कोरांटीची फुले’, ‘ज्योतिषशास्त्र एक दिव्य दृष्टी’ आणि ‘स्वप्न साक्षात्कार’ ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ‘हा कुंभ अमृताचा’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार मिळाला आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा ‘ठाणेभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.मान्यवर उपस्थितते आयुष्याचे शतक निश्चितपणे पार करतील, असे वाटत असतानाच गुरु वारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या