शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:45 IST

ऐतिहासिक किल्ले दुगार्डीच्या त्रिपुरोत्सव उत्सवाचे प्रणेते  मनोहर वैद्य यांचे पार्कीन्सन आजाराने बुधवारी कल्याण येथे निधन झाले. दुगार्डी किल्ल्यावर साजरी होणारी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव नव्या पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांनी १९६० मध्ये किल्यावर त्रिपुरोत्सव सुरु केला होता.

डोंबिवली - ऐतिहासिक किल्ले दुगार्डीच्या त्रिपुरोत्सव उत्सवाचे प्रणेते  मनोहर वैद्य यांचे पार्कीन्सन आजाराने बुधवारी कल्याण येथे निधन झाले. दुगार्डी किल्ल्यावर साजरी होणारी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव नव्या पिढीला माहिती व्हावे यासाठी त्यांनी १९६० मध्ये किल्यावर त्रिपुरोत्सव सुरु केला होता. बालपणापासून ते कल्याणमध्ये वास्तव्याला होते, मल्हार संकूल येथे त्यांचे निधन झाले. 

छत्रपती शिवरायांनी ज्या ठिकाणी आरमार स्थापन करून संपूर्ण जगाला हिंदवी स्वराज्य कसे असु शकते याची प्रचिती करून देण्याचा प्रयत्न केला. त्या खाडीच्या किना-यालगतच हा दुगार्डी किल्ला असल्याने त्याचे एक वेगळे महत्व आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापन झाली त्या निमित्ताने कल्याणच्या नगराध्यक्षा  सुशीला खोब्रागडे यांच्या नेतुत्वाखाली नागरिकांची एक मिरवणूक किल्ल्यावर येणार होती. म्हणून कल्याणच्या संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांनी दुगार्डीवर ध्वजारोहण केले. तेव्हा देवळात काहीही नव्हते.तरुणांनीच एक दगड आणून शेंदूर फासून श्रद्धेने दुगार्देवी म्हणून स्थपना केली. त्यात मनोहर वैद्य, शरद घारपुरे , मामा साठे, रमेश फडके,सुरेश साठे, विवेक रानडे,रमेश भणगे, माधव केळकर, अशी अनेक मंडळी उपस्थित असल्याची आठवण संघ स्वयंसेवक प्रविण देशमुख यांनी सांगितली.

त्यानंतर ठरल्या प्रमाणे मिरवणूक आली नगराध्यक्षा सुशीलाबाई खोब्रागडेंनी देवीची पूजा केली व किल्ल्याकडे दुर्लक्ष न करण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याच वेळी उपस्थित स्वयंसेवकांनी त्रिपुरी पोर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निश्यच केला. 

१९६० साली पासून संघ स्वयंसेवकांनी ऐतिहासिक कल्याणच्या दुगार्डी किल्ल्यावर दिपोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली, त्यावेळेस वैद्य यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी अन्य तरुण स्वयंसेवकांच्या बरोबर स्वीकारली होती. गेली ५४ वर्ष ते ही जबाबदारी चोखपणे बजावत होते. या त्रिपुर उत्सवत किल्ल्याच्या पायथ्यापासून  वरपर्यंत पणत्या लावला जातात, तसेच किल्ला वरील बुरुज, पुढचा रस्ता, मागच्या पाय-या, दिवाळी संपली की संघाचे बाल स्वयंसेवक घरोघरी जावून तेल, पणत्या व वाती जमा करतात. सुमारे साडेतीन हजार पणत्या लावल्या जातात रा.स्व. संघाच्या शाखेतील मुले विविध संस्थातील कार्यकर्ते किल्ल्यावर विविध भागात लावलेल्या पणत्या सतत तेवत रहातीलयाची काळजी घेतात. दुगार्डी किल्ला हे हिंदूंच्या भावनेचे प्रतिक आहे.कल्याण शहराची वाढती लोकसख्या व भोगोलिक परिसीमा लक्षात घेता अघिकाअधिक प्रमाणात तरूणानी याकामी सहभागी व्हावे असे आवाहन ते नेहमी करत असत अशा अनेक आठवणी कल्याणमधील संघ स्वयंसेवकांनी सांगितल्या. वैद्य यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, एक कन्या, जावई, नातवंड असा परिवार असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री मल्हार संकूल, मोहींदरसिंग शाळे समोरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. संघाच्या हिवाळी शिबिरांसह विविध संघ शिक्षा वर्गांमध्ये विद्युत विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शहरातील असंख्य सामाजिक मंडळांना बहुतांशी वेळा विनामूल्य तत्वावर त्यांनी ही सुविधा दिली होती. सेवाकार्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ