शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाण्यात भाज्यांचे दर प्रचंड कडाडले; ग्राहकांच्या खिशाला चाट, हमाली महागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 03:40 IST

१० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

ठाणे : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये ठाणेकरांची गर्दी झाली होती. ती पाहून विक्रेत्यांनी भाज्यांचे दर अचानक वाढवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी विके्रत्यांनी २० रुपयांची कोथिंबिरीची जुडी ८० रुपयांना विकल्याचे दिसून आले. इतर भाज्यांचे भावही दुप्पट ते तिप्पट दराने ते विकत होते. मात्र, वाहतूक आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर पुढील १० दिवस लॉकडाऊन असल्याने ते लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला.

उद्यापासून १० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. परंतु, भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची झोपच उडाली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्याने ते हवालदिल झाले होते. आधीच तीन महिन्यानंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्यादेखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे ठाणेकर हैराण झाले. चार दिवसांपूर्वी २० रुपये असलेले दर ४० ते ८० च्या घरात गेले आहेत.भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नाही, शासनाने या वाढणाºया दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. - प्रकाश ताम्हाणे, ग्राहक ठाणेकर

रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत. गुरुवारपासून बंद असल्यानेच विक्रेते लूट करीत आहेत. - प्रतिभा माने, गृहिणी, ठाणेकर

१० दिवस लॉकडाऊन होणार म्हणून भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. तर वाहतूक आणि आणि हमालांचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्यानेच आमचा नाईलाज असून यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत. -भाजी विक्रेते, जांभळीनाका मार्केटआजचे भाज्यांचे दर (रुपयांमध्ये)भाजी - पूर्वी - आताकोबी ३० - ५०शिमला मिर्ची ५० - ८०टॉमेटो ३० - ८०भेंडी ४० - ६०गवार ६० - ८०कोथिंबीर २० - ८०शेपू ३० - ४०काकडी २० - ४०मेथी २० - ४०पालक १० - २०

 

टॅग्स :vegetableभाज्याthaneठाणे