शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाज्यांचे दर पुन्हा कडाडले, १० हजार क्विंटलवरुन थेट ५७४५ क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:24 IST

डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

अनिकेत घमंडी डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महिनाभरात सलग तीन ते चार वेळा भाज्यांचे भाव कडाडल्याने आता खायचे तरी काय, असा सवाल विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून खरीपाच्या पिकांचा शेवट होत आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठवडाभर गारवा वाढत गेला. गेल्या तीन दिवसांपासून अचानक उष्मा वाढला. त्याचा परिणाम भाज्यांवर झाला. आवक घटली आणि दर वाढले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत एरव्ही दहा हजार क्विंटल भाजीपाला येतो. मात्र चार-पाच दिवसांपासून त्यात ४० टक्के घट झाली असून सध्या ५७४५ क्विंटल भाजीपाला येत आहे. त्यामुळेही भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे म्हणाले, अपेक्षित नसतानाही रविवार, सोमवारमध्ये पावसाने अचानक हजेरी लावली. त्याआधी महिनाभरापूर्वीच पावसाने शेतपिकाचे नुकसान केले. उभ्या पिकातल्या भाज्यांचा मोहोर गळाला, त्यामुळे हाताशी आलेले पिक गेले. त्यामुळे भाज्यांचे पिक घेणारा शेतकरी दोन महिन्यात हवालदिल झाला आहे. बाजारात घाऊक आणि किरकोळ मालाला मागणी असली, तरी पिक नसल्याने करायचे तरी काय असा सवाल शेतकºयांसमोर आणि भाजी विके्रत्यांसमोर आहे.शहरी भागात रेल्वे स्थानक परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. त्यात भाजीविके्रत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आधीच भाजी मिळत नसल्याने आबालवृद्ध हैराण झालेले असतांनाच आता भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने दुहेरी कोंडी झाली आहे. टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोंच्या घरात गेला आहे. कडधान्य विकत मिळतात, पण ती तरी किती खायची? २५ रुपये पाव किलो अशा दराने ती मिळतात. कोथिंबिरीची जुडी पाच रुपयाला मिळत होती. आता ती देखील रातोरात कडाडली. अळूची पाने २० रुपयांना सहा ते आठ मिळतात. तो मालही माल कमी असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे.>पालेभाज्याही महागल्याया घाऊक भाजीबाजारातून बदलापूर, वसई, टिटवाळा, डोंबिवली परिसरात सर्वत्र भाजीपाला जातो. जेवढा दळणवळणाचा खर्च जास्त तेवढा भाज्यांचा किलोमागे दर जास्त हे समीकरण असल्याने भाज्यांचे दर अपेक्षेपेक्षा वाढलेले आहेत.प्रत्येक भाजी किरकोळ बाजारात किलोमागे ठिकठिकाणी २० ते २५ रुपये जास्त चढ्या भावानेच विकली जात आहे. त्यामुळे ही तफावत मोठी होत गेली आहे. पालेभाज्याही कडाडल्या आहे.मेथी- ४० रूपये, पालक-१५, मुळा-३५, शेपू- १५ ते २०, कोथिंबिर - २० रुपये, कांदा पात २५ रुपये, कढीपत्ता ३० रुपये हा होलसेलचा भाव आहे.. पण प्रत्यक्षात त्या मूळ किंमतीतही १० ते १५ रुपये जास्त आकारले जातात.>भाज्यांचे घाऊक दरकल्याण कृषी उत्पन्ना बाजार समितीतील भाज्यांच्या होलसेलच्या दरानुसार, (प्रतिकिलो) भेंडी ३६ रुपये, दुधी भोपळा १५रुपये, लाल भोपळा १५ रुपये, फ्लॉवर २० रुपये, कोबी २० रुपये, गवार ४० रुपये, घेवडा ४० रुपये, वांगी ३५ रुपये, वाटाणा ६० रुपये, शिराळी ३५ रुपये, कारली ३५ रुपये, तोंडली २५ रुपये, टोमॅटो ६०रुपये, सुरण २५ रुपये, शेवगा ६० रुपये, काकडी १५ रुपये असा दर आहे.>थंडी वाढायला हवीठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही भाजी बाजारासाठी मुख्य बाजारपेठ आहे. नवी मुंबईत एपीएमसी मार्केट असल्याने तेथे पुणे, पनवेल, अलिबाग आदी भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. तर कल्याण, डोंबिवलीला नासिक, शहापूर आदी भागातील शेतमालावर अवलंबून रहावे लागते. कल्याणच्या बाजारात भाजीचा मालामध्ये कमालीची घट झाली आहे. उष्णता कमी होऊन थंडीने जोर धरायला हवा; अन्यथा पंधरवडा असाच महागाईचा जाणार असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :vegetableभाज्याdombivaliडोंबिवली