शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पावसाने भाजीपाला महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:41 IST

बजेट कोलमडले : कोथिंबीरची जुडी तब्बल ४00 ला, बाजारपेठेत आवक झाली कमी

जान्हवी मोर्ये।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पावसाचा जोर वाढल्याने शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. कल्याणच्या कृ षी उत्पन्न बाजार समितीत रविवारी सकाळी कोथिंबीरचा भाव २५० रुपये जुडीला होता. दहा वाजल्यानंतर तोच भाव ४०० रुपये जुडी झाला होता, असे किरकोळ भाजीविक्रेता संदीप सिंग यांनी सांगितले. भाज्यांच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज अंदाजे दोन ते अडीच हजार क्विंटल माल कमी येत आहे. त्यामुळे भाज्यांच्या कि मती वाढल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यशवंत पाटील यांनी दिली. डोंबिवलीच्या बाजारातदेखील भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. रविवारी भाज्यांचे भाव अचानक वाढले. शनिवारपर्यंत भाज्यांचे भाव आटोक्यात होते. भाज्यांचे भाव वाढलेले असले तरी, ग्राहक खरेदी करीत आहेत. काही ग्राहक आपल्या पसंतीच्या भाज्या खरेदी करतात, तर काही ग्राहक भाज्यांचा दर पाहून खरेदी करतात. आम्ही मात्र भाज्यांचे भाव वाढल्याने माल कमी आणला. एरव्ही साडेसात किंवा दहा कि लो माल खरेदी करतो. पण आज अडीच किलो ते पाच किलोपर्यंतच भाज्या आणल्या आहेत. फरसबी, मटार, आले, हिरवी मिरची, मेथी आणि कोंथिबीर यांच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, मोठी वांगी, छोटी वांगी, गवार, तोंडली, दुधी या भाज्यांचे भाव कि रकोळ बाजारात स्थिर आहेत.ठाण्यातही दरवाढ! गरिबांच्या जेवणातून भाजीपाला गायबठाणे : गेल्या दोन तीन दिवसांपासून ठाण्यात कोथिंबीरची जुडी २00 रुपयांच्या पुढे गेली असून, फ्लॉवरनेही शंभरीचा उंबरठा गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाहतुकीदरम्यान पावसामुळे भाजीपाला सडत असल्याने पालेभाज्यांबरोबर फळभाज्यांचेही दर वाढल्याची माहिती ठाण्यातील काही भाजीविक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मागील आठवड्यात पावसाचा जोर एवढा होता की, मुंबई महानगर परिसरात शासनाला सार्वजनिक सुटी जाहीर करावी लागली. या पावसाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या भावावर झाला आहे. पावसामुळे विक्रेत्यांचा निम्मा माल वाहतुकीदरम्यानच खराब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत.या भाववाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ही भाववाढ थोडीथोडकी नसून, तब्बल दहापटीपेक्षाही जास्त आहे. एरव्ही ३0 ते ४0 रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी रविवारी तब्बल २५0 रुपयांना विकली जात होती. शेपू, गवार आणि फ्लॉवरसारख्या इतर भाज्यांचीही तीच परिस्थिती आहे. याचा परिणाम लहानमोठ्या हॉटेल्समधील भाज्यांच्या दरावरही झाला आहे.दरवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जेवणातून बहुतांश हिरव्या भाज्या गायब झाल्या आहेत. वाहतुकीदरम्यान भाजीपाला खराब होत असल्याने विक्रेतेही माल कमीच बोलवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणीएवढा मालाचा पुरवठा सध्या तरी होत नाही. चवळी तर बाजारात मिळतच नाहीये. भाज्यांची बाजारात आवक चांगलीच कमी झाली आहे.भाजीपाल्याची आवक जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत भाव वाढलेलेच राहू शकतात, असे पालेभाज्यांचे ठाण्यातील विक्रेते निवृत्ती क्षीरसागर यांनी सांगितले. भाववाढीमुळे बरेचसे ग्राहक भाजीपाला घेण्यास धजावत नाही. २०० ते २५० रुपये जुडीने कोथिंबीर कोणीही विकत घेणार नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात मोठ्या जुडीच्या छोट्या जुड्या करून विक्रेते विकत आहेत, असे भाजीविक्रेते संभाजी खेडेकर यांनी सांगितले.