शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

वसई-विरार: जागा मिळेल तिथे आहेत रिक्षा स्टॅण्ड

By admin | Updated: March 3, 2016 02:02 IST

१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे

शशी करपे, वसर्ई१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच शहरात नवीन वसाहती होत गेल्या तस-तसे नाका तिथे स्टँड तयार झाले. परिणामी बेकायदा रिक्षा स्टँडनी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जटील करून ठेवली आहे.विरार शहरात पश्चिमेला स्टेशनलगत पूर्वी एसटी स्टँड होते. स्टँड स्थलांतरीत झाल्यानंतर रिक्षांनी ती जागा व्यापली. पण, रेल्वे स्टेशन वाढत गेल्यानंतर रिक्षा स्टँडची जागा कमी होऊन रिक्षा थेट रस्त्यावर आल्या आहेत. पूर्वेला तर रस्ता अपुरा असतानाही तिथे दोन्ही बाजूला रिक्षा स्टँड तयार झाले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला स्टेशनलगत रिक्षांच्या गर्दीने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण केला आहे. नालासोपारा स्टेशन परिसरातही तिच स्थिती आहे. पश्चिमेला जागा नसल्याने उड्डाणपूलाखालची जागा रिक्शा चालकांनी व्यापून टाकली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता गायब झाला आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. पूर्वेला उड्डाणपूलाखालची जागा रिक्षा स्टँडसाठी होती. ती अपुरी पडत असतानांच आता महापालिकेच्या परिवहन सेवेने जागा व्यापली आहे. पलिकडे स्टेशनलगत रिक्षा स्टँड होते. पण, एका नगरसेवकांने रेल्वेच्या ताब्यात असलेली जागा वडिलोपार्जित असल्याचा दावा करून तेथील रिक्षा स्टँड हटवून त्या जागेचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पूर्वेला थेट मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने लोकांना त्रस्त केले आहे. सहा वर्षे उलटली तरी सिग्नल नाहीपालिका निर्माण होऊन सहा वर्षे उलटून गेली असून अद्याप सिग्नल उभारलेले नाहीत. शहरातील अनेक भागातील मुख्य रस्ते इतके अरुंद आहेत की गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणा कशी कार्यान्वित होणार? हा प्रश्न निर्माण होतो. अधिकृत रिक्षा स्टँड करण्यात पोलीस आणि पालिका प्रशासन यशस्वी होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणे अवघड होणार आहे. मध्यंतरी आरटीओकडून तालुक्यातील १५० ठिकाणांचा स्टँडसाठी सर्व्हे देखील करण्यात आला आहे. पण, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कसे करणार? नव्या स्टँडसाठी पुरेशी जागा कशी उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे. थेट मुख्य रस्त्यावर अतिक्रमणवसई रोड रेल्वे परिसरातही अशीच स्थिती आहे. पश्चिमेचा रिक्षा स्टँड स्टेशनचा कायापालट झाल्याने आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रिक्षांनी थेट मुख्य रस्ता व्यापून टाकला असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता महापालिका परिवहनचा थांबा मुख्य रस्त्यावर आल्याने स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता रिक्षा आणि बसेसपुरताच उरला आहे. त्यांच्या गर्दीतून वाट काढत चालणे देखील जिकीरीची होऊन बसले आहे. पूर्वेची परिस्थिती तर खूपच भयावह आहे. रिक्षा स्टँड आणि परिवहन सेवेच्या बसेसनी रस्ता व्यापून टाकला आहे.