शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

वसई-विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात संशयाचा धूर, नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:10 IST

वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.

वसई : वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.१३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील महापालिकांनी ज्यांची लोकसंख्या एक दशलक्ष पेक्षा अधिक आहे, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन दलासाठी योजना तयार ठेवणे आवश्यक आहे. २०११ च्या जनगणेनुसार वसई विरार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख २१ हजार २३३ इतकी आहे. राज्यभरातील इतर महापालिकांनी आपल्याकडील अग्निशमन योजना भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांच्यासमोर प्रसारीत केलेली आहे. मात्र, वसई विरार महापालिकेने आपल्याकडील अग्निशमन यंत्रणेची माहिती दिली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.महापालिकेकडे अत्याधुनिक साधनसामुग्री अस्तित्वात असताना त्याची माहिती कॅगला दिली नाही. कारण यात काहीतरी गैरप्रकार असल्याचा संशय शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. महापालिका नागरीकांकडून अग्निशमन कर वसुल करते. त्या तुलनेत नागरीकांना सुरक्षा पुरवण्यात महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसणे ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि रहिवाशी इमारती आहेत. शेकडोचाळी आणि इमारतींमध्ये लोक दाटीवाटीने रहात आहेत. सध्या अस्तित्वात असलेली अग्निशमन यंत्रणा अपुरी असून कर्मचारी वर्गही अपुरा आहे. भविष्यात दुदैवाने एखादा मोठा बाका प्रसंग उद् भवल्यास सध्याच्या यंत्रणेला त्यावर नियंत्रण आणणे अवघड जाणार आहे, अशी तक्रारही करण्यात आली आहे.