शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वसई-विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात संशयाचा धूर, नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:10 IST

वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.

वसई : वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.१३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील महापालिकांनी ज्यांची लोकसंख्या एक दशलक्ष पेक्षा अधिक आहे, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन दलासाठी योजना तयार ठेवणे आवश्यक आहे. २०११ च्या जनगणेनुसार वसई विरार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख २१ हजार २३३ इतकी आहे. राज्यभरातील इतर महापालिकांनी आपल्याकडील अग्निशमन योजना भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांच्यासमोर प्रसारीत केलेली आहे. मात्र, वसई विरार महापालिकेने आपल्याकडील अग्निशमन यंत्रणेची माहिती दिली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.महापालिकेकडे अत्याधुनिक साधनसामुग्री अस्तित्वात असताना त्याची माहिती कॅगला दिली नाही. कारण यात काहीतरी गैरप्रकार असल्याचा संशय शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. महापालिका नागरीकांकडून अग्निशमन कर वसुल करते. त्या तुलनेत नागरीकांना सुरक्षा पुरवण्यात महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसणे ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि रहिवाशी इमारती आहेत. शेकडोचाळी आणि इमारतींमध्ये लोक दाटीवाटीने रहात आहेत. सध्या अस्तित्वात असलेली अग्निशमन यंत्रणा अपुरी असून कर्मचारी वर्गही अपुरा आहे. भविष्यात दुदैवाने एखादा मोठा बाका प्रसंग उद् भवल्यास सध्याच्या यंत्रणेला त्यावर नियंत्रण आणणे अवघड जाणार आहे, अशी तक्रारही करण्यात आली आहे.