शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:21 IST

सहा दिवसांत कापले ६८० किलोमीटरचे अंतर; खराब रस्त्यांसह अनेक आव्हानांवर केली मात

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मागील वर्षीचा डोंबिवली ते पणजी या सायकलदौऱ्याचा अनुभव गाठीशी असलेले येथील शशांक वैद्य व मीरा वैद्य या दाम्पत्याने यंदा नुकतीच ६८० किलोमीटरची अष्टविनायक यात्रा सायकलने सहा दिवसांत पूर्ण केली. त्यांच्या या सायकलस्वारीचे शहरात कौतुक होत आहे.सायकलमित्र असलेल्या वैद्य दाम्पत्याने याआधी सायकलने सात दिवसांत अष्टविनायक यात्रा केली आहे. त्यामुळे यंदाही सात दिवसांत ही यात्रा पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, अगोदरच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ३ ते ८ नोव्हेंबर, अशा सहा दिवसांतच ६८० किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली.वैद्य दाम्पत्य पुढे म्हणाले की, ‘केवळ आवड व तब्येत राखण्यासाठी आम्ही सायकल चालवू लागलो. पुढे आम्हाला सायकलयात्रा करण्याचा छंदच जडला. माघी चतुर्थीनिमित्त ३४ वर्षे कल्याण ते पाली सायकलयात्रा करणारे विलास वैद्य व ठाण्यातील राजीव दुधळकर यांनी आम्हाला पालीच्या गणपतीपर्यंत साथ दिली. प्रथम महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. तेथे विलास वैद्य यांनी आम्हाला पंक्चर झाल्यास ते कसे काढावे, ट्युब कशी बदलावी, सायकलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. उल्हासनगर येथून सायकलवरून अष्टविनायक दर्शनास निघालेले उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर हे आम्हाला महड येथे भेटले. महडच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पाली येथे मुक्काम केला.’ते पुढे म्हणाले, ‘दुसºया दिवशी तळेगावला मुक्काम केला. त्यानंतर तिसºया दिवशी दुपारी आम्ही थेऊरला पोहोचलो. तेथे थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराचे विश्वस्थ हभप आनंद तांबे यांनी आमचे स्वागत केले. उरुळी ते जेजुरीमधील घाट टाळण्यासाठी आम्ही भांडगावमार्गे मोरगावला गेलो. वाटेत आम्हाला बारामती सायकल क्लबचे अन्य सायकलमित्र भेटले. धनंजय मदान यांनी मोरगाव येथे आमची राहण्याची सोय केली होती.’मोरगावहून सिद्धटेकला आम्ही गेलो. तेथील सिद्धिविनायकाच्या मंदिरातील पुजाऱ्यांना आम्ही सायकलवरून अष्टविनायक यात्रा करत आहोत, हे समजताच त्यांनी सायकलसाठी देवाचे हार दिले. हा आमच्यासाठी सुखद अनुभव होता,’ असे वैद्य म्हणाले. सिद्धटेकहून आम्ही परत दौंडमार्गे केडगाव चौफुला येथे मुक्कामासाठी आलो. वाटेत पाटस-सिद्धटेक हा ३३ किमीचा रस्ता खराब होता. याच रस्त्याने एकाच दिवसात आम्ही परतीचाही प्रवास केला. अशा एकंदर ६६ किमीच्या रस्त्यात पंक्चर काढण्याचे प्रशिक्षणही उपयोगी पडल्याचे ते म्हणाले.रात्रीपर्यंत ओझरमार्गे लेण्याद्रीला पोहोचण्याचे ठरवले होते. ओझरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली. तेथील ग्रामस्थांनी लेण्याद्रीच्या वाटेत वाघ असल्याचे सांगून रात्री प्रवास न करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला. शेवटच्या दिवशी लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेशखिंडीतील चढ पार केला व तेथील गणेश मंदिरात आम्ही दर्शन घेतले. माळशेज घाटातून मुरबाडमार्गे गोवेली येथे आम्ही पोहोचलो. तेथे रायते येथील मित्र आमच्या स्वागतासाठी आले होते. तेथे उल्हासनगरच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही ८ नोव्हेंबरला डोंबिवलीला घरी परतलो. शेवटच्या दिवशी लेण्याद्री डोंगर चढणे, उतरणे यासह १४५ किमीचा सायकल प्रवास झाला होता. गोव्यापेक्षाही या यात्रेने आम्हाला खूप समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.दिवसभरात १२ तास केले सायकलिंगवैद्य दाम्पत्य सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत सायकलने प्रवास करत असे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू होत असे. त्यानंतर साधारण ९-९.३० च्या सुमारास नाश्त्यासाठी ते विसावा घेत. त्यानंतर, १० ते १२.३० च्या सुमारास मधला टप्पा. त्यानंतर जेवण, विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता पुन्हा पुढचा टप्पा सुरू होत असत. दुपारी ४ च्या सुमारास चहापान. ते झाल्यानंतर साधारण ६ वाजेपर्यंत पुन्हा प्रवास केल्यानंतर मुक्काम करत असत.

टॅग्स :Ashtavinayakअष्टविनायक गणपती