शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
2
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
4
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
5
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
6
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
7
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
8
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
9
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
10
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
11
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
12
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
13
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
14
Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
15
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
16
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
17
कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
18
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
19
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
20
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:21 IST

सहा दिवसांत कापले ६८० किलोमीटरचे अंतर; खराब रस्त्यांसह अनेक आव्हानांवर केली मात

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मागील वर्षीचा डोंबिवली ते पणजी या सायकलदौऱ्याचा अनुभव गाठीशी असलेले येथील शशांक वैद्य व मीरा वैद्य या दाम्पत्याने यंदा नुकतीच ६८० किलोमीटरची अष्टविनायक यात्रा सायकलने सहा दिवसांत पूर्ण केली. त्यांच्या या सायकलस्वारीचे शहरात कौतुक होत आहे.सायकलमित्र असलेल्या वैद्य दाम्पत्याने याआधी सायकलने सात दिवसांत अष्टविनायक यात्रा केली आहे. त्यामुळे यंदाही सात दिवसांत ही यात्रा पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, अगोदरच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ३ ते ८ नोव्हेंबर, अशा सहा दिवसांतच ६८० किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली.वैद्य दाम्पत्य पुढे म्हणाले की, ‘केवळ आवड व तब्येत राखण्यासाठी आम्ही सायकल चालवू लागलो. पुढे आम्हाला सायकलयात्रा करण्याचा छंदच जडला. माघी चतुर्थीनिमित्त ३४ वर्षे कल्याण ते पाली सायकलयात्रा करणारे विलास वैद्य व ठाण्यातील राजीव दुधळकर यांनी आम्हाला पालीच्या गणपतीपर्यंत साथ दिली. प्रथम महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. तेथे विलास वैद्य यांनी आम्हाला पंक्चर झाल्यास ते कसे काढावे, ट्युब कशी बदलावी, सायकलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. उल्हासनगर येथून सायकलवरून अष्टविनायक दर्शनास निघालेले उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर हे आम्हाला महड येथे भेटले. महडच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पाली येथे मुक्काम केला.’ते पुढे म्हणाले, ‘दुसºया दिवशी तळेगावला मुक्काम केला. त्यानंतर तिसºया दिवशी दुपारी आम्ही थेऊरला पोहोचलो. तेथे थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराचे विश्वस्थ हभप आनंद तांबे यांनी आमचे स्वागत केले. उरुळी ते जेजुरीमधील घाट टाळण्यासाठी आम्ही भांडगावमार्गे मोरगावला गेलो. वाटेत आम्हाला बारामती सायकल क्लबचे अन्य सायकलमित्र भेटले. धनंजय मदान यांनी मोरगाव येथे आमची राहण्याची सोय केली होती.’मोरगावहून सिद्धटेकला आम्ही गेलो. तेथील सिद्धिविनायकाच्या मंदिरातील पुजाऱ्यांना आम्ही सायकलवरून अष्टविनायक यात्रा करत आहोत, हे समजताच त्यांनी सायकलसाठी देवाचे हार दिले. हा आमच्यासाठी सुखद अनुभव होता,’ असे वैद्य म्हणाले. सिद्धटेकहून आम्ही परत दौंडमार्गे केडगाव चौफुला येथे मुक्कामासाठी आलो. वाटेत पाटस-सिद्धटेक हा ३३ किमीचा रस्ता खराब होता. याच रस्त्याने एकाच दिवसात आम्ही परतीचाही प्रवास केला. अशा एकंदर ६६ किमीच्या रस्त्यात पंक्चर काढण्याचे प्रशिक्षणही उपयोगी पडल्याचे ते म्हणाले.रात्रीपर्यंत ओझरमार्गे लेण्याद्रीला पोहोचण्याचे ठरवले होते. ओझरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली. तेथील ग्रामस्थांनी लेण्याद्रीच्या वाटेत वाघ असल्याचे सांगून रात्री प्रवास न करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला. शेवटच्या दिवशी लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेशखिंडीतील चढ पार केला व तेथील गणेश मंदिरात आम्ही दर्शन घेतले. माळशेज घाटातून मुरबाडमार्गे गोवेली येथे आम्ही पोहोचलो. तेथे रायते येथील मित्र आमच्या स्वागतासाठी आले होते. तेथे उल्हासनगरच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही ८ नोव्हेंबरला डोंबिवलीला घरी परतलो. शेवटच्या दिवशी लेण्याद्री डोंगर चढणे, उतरणे यासह १४५ किमीचा सायकल प्रवास झाला होता. गोव्यापेक्षाही या यात्रेने आम्हाला खूप समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.दिवसभरात १२ तास केले सायकलिंगवैद्य दाम्पत्य सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत सायकलने प्रवास करत असे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू होत असे. त्यानंतर साधारण ९-९.३० च्या सुमारास नाश्त्यासाठी ते विसावा घेत. त्यानंतर, १० ते १२.३० च्या सुमारास मधला टप्पा. त्यानंतर जेवण, विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता पुन्हा पुढचा टप्पा सुरू होत असत. दुपारी ४ च्या सुमारास चहापान. ते झाल्यानंतर साधारण ६ वाजेपर्यंत पुन्हा प्रवास केल्यानंतर मुक्काम करत असत.

टॅग्स :Ashtavinayakअष्टविनायक गणपती