शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:21 IST

सहा दिवसांत कापले ६८० किलोमीटरचे अंतर; खराब रस्त्यांसह अनेक आव्हानांवर केली मात

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मागील वर्षीचा डोंबिवली ते पणजी या सायकलदौऱ्याचा अनुभव गाठीशी असलेले येथील शशांक वैद्य व मीरा वैद्य या दाम्पत्याने यंदा नुकतीच ६८० किलोमीटरची अष्टविनायक यात्रा सायकलने सहा दिवसांत पूर्ण केली. त्यांच्या या सायकलस्वारीचे शहरात कौतुक होत आहे.सायकलमित्र असलेल्या वैद्य दाम्पत्याने याआधी सायकलने सात दिवसांत अष्टविनायक यात्रा केली आहे. त्यामुळे यंदाही सात दिवसांत ही यात्रा पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, अगोदरच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ३ ते ८ नोव्हेंबर, अशा सहा दिवसांतच ६८० किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली.वैद्य दाम्पत्य पुढे म्हणाले की, ‘केवळ आवड व तब्येत राखण्यासाठी आम्ही सायकल चालवू लागलो. पुढे आम्हाला सायकलयात्रा करण्याचा छंदच जडला. माघी चतुर्थीनिमित्त ३४ वर्षे कल्याण ते पाली सायकलयात्रा करणारे विलास वैद्य व ठाण्यातील राजीव दुधळकर यांनी आम्हाला पालीच्या गणपतीपर्यंत साथ दिली. प्रथम महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. तेथे विलास वैद्य यांनी आम्हाला पंक्चर झाल्यास ते कसे काढावे, ट्युब कशी बदलावी, सायकलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. उल्हासनगर येथून सायकलवरून अष्टविनायक दर्शनास निघालेले उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर हे आम्हाला महड येथे भेटले. महडच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पाली येथे मुक्काम केला.’ते पुढे म्हणाले, ‘दुसºया दिवशी तळेगावला मुक्काम केला. त्यानंतर तिसºया दिवशी दुपारी आम्ही थेऊरला पोहोचलो. तेथे थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराचे विश्वस्थ हभप आनंद तांबे यांनी आमचे स्वागत केले. उरुळी ते जेजुरीमधील घाट टाळण्यासाठी आम्ही भांडगावमार्गे मोरगावला गेलो. वाटेत आम्हाला बारामती सायकल क्लबचे अन्य सायकलमित्र भेटले. धनंजय मदान यांनी मोरगाव येथे आमची राहण्याची सोय केली होती.’मोरगावहून सिद्धटेकला आम्ही गेलो. तेथील सिद्धिविनायकाच्या मंदिरातील पुजाऱ्यांना आम्ही सायकलवरून अष्टविनायक यात्रा करत आहोत, हे समजताच त्यांनी सायकलसाठी देवाचे हार दिले. हा आमच्यासाठी सुखद अनुभव होता,’ असे वैद्य म्हणाले. सिद्धटेकहून आम्ही परत दौंडमार्गे केडगाव चौफुला येथे मुक्कामासाठी आलो. वाटेत पाटस-सिद्धटेक हा ३३ किमीचा रस्ता खराब होता. याच रस्त्याने एकाच दिवसात आम्ही परतीचाही प्रवास केला. अशा एकंदर ६६ किमीच्या रस्त्यात पंक्चर काढण्याचे प्रशिक्षणही उपयोगी पडल्याचे ते म्हणाले.रात्रीपर्यंत ओझरमार्गे लेण्याद्रीला पोहोचण्याचे ठरवले होते. ओझरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली. तेथील ग्रामस्थांनी लेण्याद्रीच्या वाटेत वाघ असल्याचे सांगून रात्री प्रवास न करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला. शेवटच्या दिवशी लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेशखिंडीतील चढ पार केला व तेथील गणेश मंदिरात आम्ही दर्शन घेतले. माळशेज घाटातून मुरबाडमार्गे गोवेली येथे आम्ही पोहोचलो. तेथे रायते येथील मित्र आमच्या स्वागतासाठी आले होते. तेथे उल्हासनगरच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही ८ नोव्हेंबरला डोंबिवलीला घरी परतलो. शेवटच्या दिवशी लेण्याद्री डोंगर चढणे, उतरणे यासह १४५ किमीचा सायकल प्रवास झाला होता. गोव्यापेक्षाही या यात्रेने आम्हाला खूप समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.दिवसभरात १२ तास केले सायकलिंगवैद्य दाम्पत्य सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत सायकलने प्रवास करत असे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू होत असे. त्यानंतर साधारण ९-९.३० च्या सुमारास नाश्त्यासाठी ते विसावा घेत. त्यानंतर, १० ते १२.३० च्या सुमारास मधला टप्पा. त्यानंतर जेवण, विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता पुन्हा पुढचा टप्पा सुरू होत असत. दुपारी ४ च्या सुमारास चहापान. ते झाल्यानंतर साधारण ६ वाजेपर्यंत पुन्हा प्रवास केल्यानंतर मुक्काम करत असत.

टॅग्स :Ashtavinayakअष्टविनायक गणपती