शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वडवली उड्डाणपूल स्लो ट्रॅकवर

By admin | Updated: January 13, 2017 06:52 IST

आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम

कल्याण : आंबिवली रेल्वेस्थानकाजवळील वडवली आणि मोहने या भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सहा वर्षे रखडले आहे. रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने वाहनचालकांना सध्या पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी येथील रेल्वे फाटकाजवळ तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनानंतर अन्य ठिकाणच्या पुलांची कामे मार्गी लागली असताना वडवली पुलाला सापत्न वागणूक का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.२०१० मध्ये तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात या कामाचे भूमिपूजन झाले होते. हे काम तीन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. परंतु, आजही हे काम अर्धवट आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी केडीएमसीकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत. या पुलाचे काम सुरू केल्यानंतर अन्य उड्डाणपूल आणि स्कायवॉकची कामे हाती घेऊन ती पूर्णही झाली. परंतु, वडवली पुलाचे काम रखडलेल्या स्थितीत असल्याचे चित्र अनेक वर्षे पाहावयास मिळत आहे. या अपूर्ण राहिलेल्या कामामुळे आंबिवली रेल्वेलगत असलेल्या समांतर रस्त्याच्या नूतनीकरणाचे कामही पूर्णत: रखडले आहे. उड्डाणपूल नसल्याने येजा करणारी अवजड वाहने याच समांतर रस्त्यावरून जात असल्याने तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. जागामालकाचे वाद असल्याने काही कालावधीसाठी पुलाच्या कामामध्ये व्यत्यय आला होता. मात्र, आता वादही संपुष्टात आल्याचे बोलले जाते. मग, कामाला प्रारंभ का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही. (प्रतिनिधी)