शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:04 IST

बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय.

मीरारोड - उत्तन नाका पासुन पाली पर्यंतचा रस्ता अतिक्रमण व बेकायदा पार्किंगच्या विळख्यात सापडला असुन यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने परिसरातील चर्च समिती मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांच्या तक्रारी वरुन आज पोलीस, महापालिका व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी करुन तातडीने कारवाईची ग्वाही दिली आहे.

भाईंदरच्या उत्तन नाका पर्यंतचा रस्ता नुकताच जुनी दुकाने - घरं तोडुन रुंद करण्यात आला. परंतु या रुंदिकरणा नंतर देखील येथे बेकरी वाल्याची लाकडं तर अन्य लोकांचे सामान भर रस्त्यातच ठेवले जात आहे. शिवाय रस्त्या लगत बेकायदा पार्किंग केली जात आहे. उत्तन नाका येथे तर महापालिकेच्या बस स्थानकालाच रिक्षा चालकांनी विळखा घातला आहे. बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय. शिवाय नाक्यावर असणाराया टराया, हातगाड्या व दुचाकी , रिक्षा आदिंची मनमानी पार्किंग मुळे मोठी वाहतुक कोंडी होते.

उत्तन नाका पासुन मार्केट पर्यंत देखील वाढिव बांधकामे, पत्राशेड, टपरायांचे अतिक्रमण मोठे आहे. शिवाय दुचाकी, रिक्षा व अवजड मोठया वाहनांची पार्किंग बेकायदा होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत आहे. येथील पालिकेची मंडई असुन सुध्दा बाहेरच्या बाजुला मोठ्या प्रमाणात हातगाड्या, भाजी - फळवाल्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे येथे सुध्दा नेहमीच कोंडी होते. पुढे करईपाडा पर्यंत देखील बेकायदा दुकाने खाडित भराव करुन बांधली असुन तेथे देखील रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी वाहने रस्ता अडवुन उभी केली जातात.

सततच्या बेशिस्त व बेकायदा पार्किग तसेच अतिक्रमण व हातगाड्या आदिं मुळे वाहतुक कोंडी कायमची झालेली आहे. शाळकरी मुलं, महिला, नागिरकांना चालण्यासाठी येथे पदपथ व रस्ताच उरत नाही. वाहतुक कोंडीत अडकुन पडल्याने शाळेत वा कामाला जायला नेहमीच उशीर होतो. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सुध्दा यायला - जायला अडथळा होतो. यामुळे ध्वनी आणि वायु प्रदुषण प्रचंड वाढले आहे असा संताप येथील नागरिकां मध्ये आहे.

परंतु कार्यवाही होत नसल्याने चर्च समिती मधील सामाजिक शाखेच्या ल्युसी परेरा, पिंकी मिरांडा, अस्टेलिनिया तान्या, विल्यम सांबराया, जॅरोम रॉड्रिक्स, गोरेटी डोंगरकर, कॅरल मुनिस, वेलेन्सीया मारवी, सिंड्रेला मुनिस, वेलेन्सीया मेंडोन्सा, राल्फ डिसोझा, आॅलिंडा बांड्या, जॉविटा तान्या, वंदना नून, शर्मिला मुनिस आदिंनी या गंभीर बनत चाललेल्या समस्ये विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. या प्रकरणी त्यांनी निवेदन तयार करुन ठोस कारवाईची मागणी केली.

सामाजिक शाखेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरुन आज बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सतिश निकम, प्रभाग अधिकारी सुनिल यादव सह सभापती विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद, शर्मिला बगाजी व एलायस बांड्या आदिंनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी देखील वाहतुक कोंडी बद्दल आपले अनुभव सांगत कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी महापालिका आणि पोलीसांनी बेकायदा पार्किंग, अतिक्रमण, हातगाड्या, वाढिव बांधकामे तसेच रिक्षा व अवजड वाहनांवर सातत्याने कारवाईचे आश्वासन दिले. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यासह वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन ची नियुक्ती आणि उत्तन पोलीसां कडुन सततची कारवाई करण्याची ग्वाही दिली गेली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस