शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:04 IST

बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय.

मीरारोड - उत्तन नाका पासुन पाली पर्यंतचा रस्ता अतिक्रमण व बेकायदा पार्किंगच्या विळख्यात सापडला असुन यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने परिसरातील चर्च समिती मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांच्या तक्रारी वरुन आज पोलीस, महापालिका व नगरसेवकांनी संयुक्त पाहणी करुन तातडीने कारवाईची ग्वाही दिली आहे.

भाईंदरच्या उत्तन नाका पर्यंतचा रस्ता नुकताच जुनी दुकाने - घरं तोडुन रुंद करण्यात आला. परंतु या रुंदिकरणा नंतर देखील येथे बेकरी वाल्याची लाकडं तर अन्य लोकांचे सामान भर रस्त्यातच ठेवले जात आहे. शिवाय रस्त्या लगत बेकायदा पार्किंग केली जात आहे. उत्तन नाका येथे तर महापालिकेच्या बस स्थानकालाच रिक्षा चालकांनी विळखा घातला आहे. बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय. शिवाय नाक्यावर असणाराया टराया, हातगाड्या व दुचाकी , रिक्षा आदिंची मनमानी पार्किंग मुळे मोठी वाहतुक कोंडी होते.

उत्तन नाका पासुन मार्केट पर्यंत देखील वाढिव बांधकामे, पत्राशेड, टपरायांचे अतिक्रमण मोठे आहे. शिवाय दुचाकी, रिक्षा व अवजड मोठया वाहनांची पार्किंग बेकायदा होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत आहे. येथील पालिकेची मंडई असुन सुध्दा बाहेरच्या बाजुला मोठ्या प्रमाणात हातगाड्या, भाजी - फळवाल्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे येथे सुध्दा नेहमीच कोंडी होते. पुढे करईपाडा पर्यंत देखील बेकायदा दुकाने खाडित भराव करुन बांधली असुन तेथे देखील रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी वाहने रस्ता अडवुन उभी केली जातात.

सततच्या बेशिस्त व बेकायदा पार्किग तसेच अतिक्रमण व हातगाड्या आदिं मुळे वाहतुक कोंडी कायमची झालेली आहे. शाळकरी मुलं, महिला, नागिरकांना चालण्यासाठी येथे पदपथ व रस्ताच उरत नाही. वाहतुक कोंडीत अडकुन पडल्याने शाळेत वा कामाला जायला नेहमीच उशीर होतो. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सुध्दा यायला - जायला अडथळा होतो. यामुळे ध्वनी आणि वायु प्रदुषण प्रचंड वाढले आहे असा संताप येथील नागरिकां मध्ये आहे.

परंतु कार्यवाही होत नसल्याने चर्च समिती मधील सामाजिक शाखेच्या ल्युसी परेरा, पिंकी मिरांडा, अस्टेलिनिया तान्या, विल्यम सांबराया, जॅरोम रॉड्रिक्स, गोरेटी डोंगरकर, कॅरल मुनिस, वेलेन्सीया मारवी, सिंड्रेला मुनिस, वेलेन्सीया मेंडोन्सा, राल्फ डिसोझा, आॅलिंडा बांड्या, जॉविटा तान्या, वंदना नून, शर्मिला मुनिस आदिंनी या गंभीर बनत चाललेल्या समस्ये विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. या प्रकरणी त्यांनी निवेदन तयार करुन ठोस कारवाईची मागणी केली.

सामाजिक शाखेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरुन आज बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सतिश निकम, प्रभाग अधिकारी सुनिल यादव सह सभापती विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद, शर्मिला बगाजी व एलायस बांड्या आदिंनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी देखील वाहतुक कोंडी बद्दल आपले अनुभव सांगत कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी महापालिका आणि पोलीसांनी बेकायदा पार्किंग, अतिक्रमण, हातगाड्या, वाढिव बांधकामे तसेच रिक्षा व अवजड वाहनांवर सातत्याने कारवाईचे आश्वासन दिले. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यासह वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन ची नियुक्ती आणि उत्तन पोलीसां कडुन सततची कारवाई करण्याची ग्वाही दिली गेली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस