शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भिवंडीतील डाईंग सायझिंगमध्ये प्लास्टिक चिंध्यांचा सऱ्हास वापर; प्रदूषणामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:03 IST

कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत .

नितिन पंडीत 

भिवंडी ( दि. ४ ) कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायजिंग कंपन्यांच्या बॉयलारमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून यामुळे शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनदेखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत .  

  भिवंडी शहरात सुमारे सात लाख यंत्रमाग असून शहरात तब्बल ८० हुन अधिक सायझिंग कंपन्या आहेत . ज्यात ८० हुन अधिक बॉयलर असून ते २४ तास जळत असतात . या बॉयलर मध्ये दगडी कोळसा व लाकूड जळण्याचे आदेश असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षा मुळे अनेक सायझिंग बॉयलर मध्ये प्लास्टिक कचरा ,कपड्याच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचे समोर येत आहे. या प्लास्टिक व चिंध्यांमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरीकांना जडत आहेत.भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायझिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासन या दोघांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक या बॉयलर मध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा १० रुपये किलो तर लाकूड ५ रुपये किलो ने मिळत असल्याची माहिती माल्ट असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या कचरा २ रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वतः इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक व चिंध्यांचा वापर बॉयलर मध्ये करीत आहेत . हा प्लास्टिक जाळल्याने त्या पासून निघणार रासायनिक घटक असलेला धूर हा नागरीकां सह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे.

विशेष म्हणजे भिवंडी सह ठाणे मुंब्रा ,कल्याण डोंबिवली येथील भंगार व्यवसायिकांची टोळी हा प्लास्टिक कचरा भिवंडी शहरातील सायझिंग चालकांना पुरवीत असून रात्री आठ ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हे कृत्य केले जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक मनपा प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे काही डाईंग सायजिंग या शहरालगतच्या ग्रामीण भागात असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणात बॉयलर मध्ये प्लास्टिक व कापडी चिंध्या जळाल्याचे प्रकार समोर येत आहेत . 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे