शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

भिवंडीतील डाईंग सायझिंगमध्ये प्लास्टिक चिंध्यांचा सऱ्हास वापर; प्रदूषणामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:03 IST

कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत .

नितिन पंडीत 

भिवंडी ( दि. ४ ) कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायजिंग कंपन्यांच्या बॉयलारमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून यामुळे शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनदेखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत .  

  भिवंडी शहरात सुमारे सात लाख यंत्रमाग असून शहरात तब्बल ८० हुन अधिक सायझिंग कंपन्या आहेत . ज्यात ८० हुन अधिक बॉयलर असून ते २४ तास जळत असतात . या बॉयलर मध्ये दगडी कोळसा व लाकूड जळण्याचे आदेश असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षा मुळे अनेक सायझिंग बॉयलर मध्ये प्लास्टिक कचरा ,कपड्याच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचे समोर येत आहे. या प्लास्टिक व चिंध्यांमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरीकांना जडत आहेत.भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायझिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासन या दोघांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक या बॉयलर मध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा १० रुपये किलो तर लाकूड ५ रुपये किलो ने मिळत असल्याची माहिती माल्ट असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या कचरा २ रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वतः इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक व चिंध्यांचा वापर बॉयलर मध्ये करीत आहेत . हा प्लास्टिक जाळल्याने त्या पासून निघणार रासायनिक घटक असलेला धूर हा नागरीकां सह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे.

विशेष म्हणजे भिवंडी सह ठाणे मुंब्रा ,कल्याण डोंबिवली येथील भंगार व्यवसायिकांची टोळी हा प्लास्टिक कचरा भिवंडी शहरातील सायझिंग चालकांना पुरवीत असून रात्री आठ ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हे कृत्य केले जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक मनपा प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे काही डाईंग सायजिंग या शहरालगतच्या ग्रामीण भागात असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणात बॉयलर मध्ये प्लास्टिक व कापडी चिंध्या जळाल्याचे प्रकार समोर येत आहेत . 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे