शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अपर तहसीलदार कार्यालय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:58 IST

कारभारही जेमतेम; लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ, दिव्यांग संतप्त

भाईंदर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी घाईगडबडीत कोणताही विचार न करताच भाईंदरच्या ९० फुटी मार्गावरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु केलेले अपर तहसीलदार कार्यालय नागरिकांसह ज्येष्ठ, दिव्यांग आदींना त्रासदायक ठरले आहे. लिफ्ट नसल्याने दोन मजले चढून जाणे अवघड जात असून या कार्यालयाचा कारभारही अजून जेमतेमच सुरू आहे.मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र तहसीलदार कार्यालय असावे अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. विशेषत: विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी ठाण्याला सेतू कार्यालयात जावे लागत होते. नंतर मात्र नगरभवन येथील महसूलच्या कार्यालयात दाखल्यांची सुविधा करुन देण्यात आली. मात्र स्वतंत्र तहसीलदार कार्यालयाची मागणी पाहता विधानसभा निवडणुकीआधी सरकारने अपर तहसीलदार कार्यालयास मंजुरी दिली.महापालिकेने कार्यालयासाठी मध्यवर्ती तसेच लिफ्ट असलेली किंवा तळमजल्यावरची जागा देणे आवश्यक असताना भार्इंदर पश्चिमेस ९० फुटी मार्गावर उड्डाणपुलाजवळ असलेल्या इमारतीतील दुसºया मजल्यावरची पालिकेची जागा या कार्यालयासाठी घाईगडबडीत दिली गेली. कशाची काहीच सुविधा, दप्तर नसताना विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागायच्या आधी घाईगडबडीत या कार्यालयाचे उद्घाटन महापौर डिंपल मेहतांसह तहसीलदार अधिक पाटील, तत्कालिन आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, अपर तहसीलदार देशमुख व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आले. या कार्यालयाचे उद््घाटनाचे राजकीय श्रये घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर हे कार्यालय बंद असल्यासारखेच होते. कारण ठाण्याहून कागरदपत्रे आणली नव्हती. कार्यालयाचे नियजोन केले नव्हते, दाखले आदी देणे सुरु नव्हते. पुरेसा कर्मचारी वर्गही नव्हता. निवडणुकीनंतर आता ठाण्याहून कागदपत्रे आणण्यास सुरूवात झाली असली तरी अपर तहसीलदारांसह दोनच कर्मचारी आहेत. टपाल घेतले जात असून दाखले देण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. परंतु कार्यालय दुसºया मजल्यावर असून असलेले जीने उंच आहेत. तर लिफ्टही नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना तर जीने चढून जाणे अशक्य बनले आहे. त्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जीने चढून जाताना धाप लागते. त्यामुळे कामासाठी येणारे नागरिक संतापले आहेत. शिवाय दुसºया मजल्यावर कार्यालयाच्या ठिकाणचा येण्याजाण्याचा पॅसेजही अत्यंत अरूंद आहे. एखादी दुर्घटना घडल्यास कार्यालयातून बाहेर पडणेही अवघड ठरणार आहे.वास्तविक तळ मजला व लिफ्ट असेल, नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी पडेल अशी इमारत कार्यालय म्हणून निवडणे आवश्यक होते. मॅक्सस मॉलमागे तसेच मॅक्सस मॉलसमोर पालिकेच्या अशा सुविधा असलेल्या इमारती असूनही महसूल विभागाच्या या महत्वाच्या कार्यालयास मात्र पालिका आणि लोकप्रतिनिधींनी जागा दिली नसल्याचे नागरिक सांगतात. काहींनी तर जमिनीबाबत मोठ्या प्रमाणात व्यवहार करणाºया एका नेत्याच्या सोयीसाठी कनकिया भागात अपर तहसील कार्यालय नेण्याचा घाट असल्याचा आरोप केला आहे. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अपर तहसीलदार देशमुख यांनी लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची गैरसोय होत असल्याने दुसरी जागा देण्यास पालिकेला कळवले असल्याचे सांगितले आहे.केवळ राजकीय फायदा लाटण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता अशा अवघड ठिकाणी तहसीलदार कार्यालय सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरी, दिव्यांग, महिला, मुले आदींचा विचारच यांना करावासा वाटत नाही हे संतापजनक आहे. नागरिकांना मध्यवर्ती भागात सोयी असलेले कार्यालय पालिकेने तातडीने दिले पाहिजे.- जॉजफ घोन्सालवीस, माजी नगरसेवकउत्तन - चौकपासून ते काजूपाडा - पेणकरपाडा पर्यंतच्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे ठरेल अशा मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असले पाहिजे. तेथे तळ मजला वा लिफ्टची सुविधा असावी. आयुक्तांनीही नागरीकांना मध्यवर्ती ठिकाणी सोयीची व सुविधा असलेली इमारत तातडीने या कार्यालयासाठी दिली पाहिजे.- प्रताप सरनाईक, आमदार