शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:38 AM

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ...

ठाणे : समुद्रकिनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाचा कहर सुरू झाला आहे. त्याचा फटका काहीअंशी ठाणे जिल्ह्यालाही बसत आहे. रविवारी दिवसभर आकाश ढगाळलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटात पावसाच्या हलक्या सरी आणि दिवसभर वादळी वारा अनुभवायला मिळाला. रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसादरम्यान ठाणे, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर मुरबाड परिसरात बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

जिल्ह्यात ‌ठिकठिकाणी वीज खंडित झाल्याच्या घटना घडल्या. गेल्या काही महिन्यात प्रथमच रविवारी जिल्ह्यात उन्हाची दाहकता जाणवली नाही. वादळी वारा, पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आणि संचारबंदीच्या अडथळ्यांमुळे नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. यादरम्यान ठाणे शहर परिसरात तीन झाडे उन्मळून पडली व दोन झाडे धोकादायक स्थितीत उभी असल्याचे निदर्शनास आले.

अंबरनाथ तालुक्यात रात्रीच्या पावसादरम्यान २५ झाडे पडली. दोन ठिकाणी छतावरील पत्रे उडून गेले. या घटनेत कोठेही जीवितहानी झालेली नाही. रविवारी दिवसभर झाडे हटविण्याचे काम पार पडले. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात १२ झाडे पडली. यादरम्यान जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांत वादळवारा काही प्रमाणात असला तरी, पाऊस पडला नसल्याचे येथील तहसीलदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.