शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेकायदा बांधकामे : तक्रारदारांना ठार मारण्याच्या धमक्या, अधिका-यांनी दाखवली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:59 IST

केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांत होत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात आतापर्यंत केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे.

कल्याण : केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांत होत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात आतापर्यंत केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे. बेकायदा बांधकामांबाबत तक्रार आल्यावर लागलीच पालिकेचे अधिकारी हे बांधकाम करणाºया स्थानिक गुंडांना त्याची कल्पना देत असल्याने अनेक तक्रारदारांना ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या आहेत.केडीएमसीत दोन वर्षांपूर्वी समाविष्ट केलेल्या २७ गावांत २०१५ पूर्वी ८० हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांविरोधात तक्रारी करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे असून स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. बेकायदा बांधकामांवरील कारवाईस या गावांमधील सर्वपक्षीय संघर्ष समितीचाच विरोध आहे. कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे करत अधिकारी कारवाई टाळत आले आहेत. त्यामुळे २७ गावांतील बेकायदा बांधकामांचे पेव कसे रोखणार, असा प्रश्न निर्माण झाला.‘लोकमत’च्या हॅलो ठाणे पुरवणीत गुरुवारी ‘२७ गावांत ८० हजार बेकायदा बांधकामे’ हे वृत्त प्रसिद्ध झाले. बाळाराम ठाकूर यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती दिली गेली. ठाकूर यांनी बेकायदा बांधकामांविरुद्ध महापालिका आयुक्त, महापौर, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे वरचेवर पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. डोंबिवलीतील जागरूक नागरिक धर्मेश जेठवा यांनी ‘ई’ प्रभागातील बेकायदा बांधकामांबाबत तक्रारी केल्या. सोनारपाडा, नांदिवली या ठिकाणी झालेल्या बेकायदा बांधकामांची यादीच जेठवा यांनी सादर केली. त्यांच्या तक्रारीचीही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. प्रशासन बेकायदा बांधकाम करणाºयांना अभय देत असल्याचा आरोप जेठवा यांनी केला. जेठवा यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांनी मदतीसाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्याकडे धाव घेतली आहे. हळबे यांनी सांगितले की, तक्रारदाराच्या जीवावर बेतले असतानाही महापालिकेच्या अधिकारीवर्गाकडून दखल घेतली जात नाही. वाढलेल्या बेकायदा बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. त्यामुळे महापालिकेची कृती ही संशयास्पद आहे. येत्या महासभेत बेकायदा बांधकामांबाबत सभा तहकुबी मांडणार आहे.कारवाईची मोहीम थंड-महापालिका व एमएमआरडीए परस्परांकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी टाळू शकत नाही. ई. रवींद्रन यांच्या काळात बेकायदा बांधकामे पाडण्याची हाती घेतलेली मोहीम थंडावली आहे. आयुक्त मधुकर अर्दड यांच्या कार्यकाळात टिटवाळा येथील ‘अ’ प्रभागातील २०० पेक्षा जास्त चाळी जमीनदोस्त केल्या होत्या. आता विद्यमान आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे