शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

ठाण्यात वृक्षांना राखी बांधून शिवशांती प्रतिष्ठानचे अनोखे रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:28 IST

वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी यावेळी केले.

ठळक मुद्दे १६६ वी वृक्षारोपण मोहीम पूर्ण१६०० रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. आतापर्यंत एक हजार ६०० वृक्षांचे रोपण झाले असून रविवारी १६६ वी वृक्षारोपण मोहीम यशस्वी केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंग यांनी दिली.रविवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर वागळे इस्टेट परिसरातील सावरकरनगर येथील झाडांना राखी बांधून रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम पूर्ण करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विनयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवडयाला वृक्ष लागवडीचा उपक्रम निरंतर आयोजित केला जात आहे. रविवारी या संस्थेने वृक्षारोपणाची ही १६६ वी मोहीम पूर्ण केली असून आतापर्यंत एक हजार ६०० रोपांची लागवड केली. मोठी झाडे किंवा अगदी लहान वनस्पती ही मानवी जीवनाचे रक्षक आहेत. बहिणी ज्याप्रमाणे स्वत:च्या संरक्षणासाठी आपल्या भावांना औक्षण करुन राखी बांधतात. त्याचप्रमाणे मानव जातीच्या रक्षणासाठी सर्वप्रथम झाडावेलींचे आभार मानून पर्यावरणाला राखी बांधली पाहिजे. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी यावेळी केले. यावेळी रंजीत सिंह, गोपाल ठाकूर आणि शिवशांती कुटूंबातील इतर सदस्यांनीही श्रमदान करुन वृक्षारोपण केले.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिक