शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मनसेचे खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:38 IST

एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.

ठाणे : एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे हे खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी शुक्रवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले. वेळेत हे खड्डे बुजवले गेले नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यांत टाकू, असा इशाराही यावेळी मनसेने दिला. दरम्यान, पोलिसांनी १४ पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन सोडले.शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी वाहन चालवणेदेखील नागरिकांना कठीण झाले आहे. प्रशासन वेळेत ते बुजवत नसल्याचा आरोप करून शुक्र वारी शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी कॅसल मिल परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी खड्ड्यांत झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडूनही पालिका प्रशासनाकडून ते बुजवण्यात येत नाही. अधिकारी केवळ आर्थिक गोष्टींमध्ये गुंतले असून त्यांना या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप यावेळी महेश कदम यांनी केला.दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, ठाणे महापालिकेच्या वतीने दरदिवशी रस्त्याला किती खड्डे पडले, कुठे पडले आहेत, याची आकडेवारी घेतली जाते. त्यानुसार, पडलेल्या खड्ड्यांवर तत्काळ मुलामासुद्धा लावला जात होता. परंतु, यंदा मात्र आजही शहरात त्यांचा साधा सर्व्हेही केलेला नाही. महापालिकेने सुरू केलेल्या स्टार ग्रेड अ‍ॅपची अद्याप ठाणेकरांना माहिती नसल्याने त्यावर केवळ खड्ड्यांच्या १४ तक्रारी मागील पाच दिवसांत प्राप्त झाल्या आहेत.