शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मनसेचे खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:38 IST

एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.

ठाणे : एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे हे खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी शुक्रवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले. वेळेत हे खड्डे बुजवले गेले नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यांत टाकू, असा इशाराही यावेळी मनसेने दिला. दरम्यान, पोलिसांनी १४ पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन सोडले.शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी वाहन चालवणेदेखील नागरिकांना कठीण झाले आहे. प्रशासन वेळेत ते बुजवत नसल्याचा आरोप करून शुक्र वारी शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी कॅसल मिल परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी खड्ड्यांत झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडूनही पालिका प्रशासनाकडून ते बुजवण्यात येत नाही. अधिकारी केवळ आर्थिक गोष्टींमध्ये गुंतले असून त्यांना या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप यावेळी महेश कदम यांनी केला.दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, ठाणे महापालिकेच्या वतीने दरदिवशी रस्त्याला किती खड्डे पडले, कुठे पडले आहेत, याची आकडेवारी घेतली जाते. त्यानुसार, पडलेल्या खड्ड्यांवर तत्काळ मुलामासुद्धा लावला जात होता. परंतु, यंदा मात्र आजही शहरात त्यांचा साधा सर्व्हेही केलेला नाही. महापालिकेने सुरू केलेल्या स्टार ग्रेड अ‍ॅपची अद्याप ठाणेकरांना माहिती नसल्याने त्यावर केवळ खड्ड्यांच्या १४ तक्रारी मागील पाच दिवसांत प्राप्त झाल्या आहेत.