शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

By सुरेश लोखंडे | Published: March 18, 2023 1:25 PM

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाणे - कांद्याला व शेती मालाला हमी भाव मिळवण्यासाठी नाशिक येथून मंत्रालयावर काढलेला किसान सभेच्या लॉंग मार्च हा शेतकऱ्यांचा मोर्चा २ दिवसापासून शहापूर तालुक्यातील वाशिंदमध्ये आडवण्यात आलेला आहे.  या शेतकऱ्यांमधील पुंडलिक आंबो जाधव (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री  दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले आहे. या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य शासनाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मोर्चेकरांची घटनास्थळी भेट घेतली. मोर्चा मागे घेतल्याने आता सर्व शेतकरी रेल्वेने घरी जायला निघाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

या मोर्चातील दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेत ले. त्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन दिले. यास अनुसरून हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्च मोर्चा चा आजचा सातवा दिवस आहे. मुंबई, ठाण्यात आगमन होण्यापूर्वी हा मोर्चा शहापूरच्या वासिंद येथील मैदानावर दोन दिवसांपासून थांबवून ठेवलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थ संक्लपीय अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडकण्यासाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या मुंबई,ठाणे महानगरातील वाहतुकीस अन्यही जनजीवनावर हा हजारो शेतकर्यांचा मोर्चा परिणाम करणारा ठरत असल्यामुळे त्यास वासिंद येथे अडवण्यात आले होते. पण या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे या मोर्चातील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे या शेतकर्यांचे नेते उमेश देशमुख यांनी स्पष्ट केले. या मोर्चातील शेतकर्यांना घरी पोहोच करण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था केली जात असल्याची चर्चा आहे.पण शेतकर्यांनी रेल्वेचे तिकीट घेऊन ते घरी जायला निघाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन