शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:56 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली...

ठाणे :  डबल इंजिन सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ आरोप करण्याचेच काम ते करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाण्यात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. 

राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरू झाले आहेत. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्याने आता नवनवे उद्योजक त्या ठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत. त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटविण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्यात येत आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत ‘मुखी राम आणि प्रत्येकाला काम’ असे आमचे  सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

कौशल्य विकास प्रबोधिनीचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून घरघंटी आणि शिलाई मशीनच्या ११ हजार लाभार्थींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते वाटप  केले. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे (हिट ॲक्शन प्लॅन) उद्घाटनही यावेळी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र स्कोअर कार्ड उद्योजकता आणि महिला उद्योजक धोरण अहवाल याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा