शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ; एकनाथ शिंदे यांची टीका

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 19:34 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर याच विरोधकांवर बरोजगार होण्याची वेळ येईल अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाणे: डबल इंजिनचे सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ आरोप करण्याचेच ते काम करीत आहेत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर याच विरोधकांवर बरोजगार होण्याची वेळ येईल अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घघाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते, त्यांच्यासमेवत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभाग लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत, गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्याने आता नवनवे उद्योजक त्याठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत. 

त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटविण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत मुखी राम आणि प्रत्येकाला काम अशा पध्दतीने आमचे सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले. मुमे मे राम बगल मे छुरी असे काम आम्ही करीत नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. घरात बसून काम करणारे सरकार नसून लोकांच्या दारात जाऊन काम देणारे असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. दोवोसला पहिल्यांदा गेलो त्यानंतर केलेल्या करारांची आता ८० टक्के अमंलबजावणी झाली आहे. तर आतासुध्दा दोओसला महत्वाचे करार करण्यात आले असून त्या माध्यमातून देखील लाखो रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्टÑ अनेक विभागात पुढे असल्याचे सांगत त्यामुळे   विरोधकांच्या पोटात दुखत आहे, परंतु त्यांच्यासाठी आपला दवाखाना आहे, अशी टिकाही त्यांनी केली. 

सरकारच्या वतीने रोजगार दिला जायोत, तर या नमो रोजगाराच्या माध्यमातून तरुणांमध्ये उत्साह नसून महाउत्सवाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले. ठाण्यातून लवकरच मेट्रो सुरु होणार असल्याने त्याचा फायदा देखील होणार आहे. समृध्दी हायवेमुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत ज्या पध्दतीने स्कील डेव्लपमेंट सुरु करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करावे अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान यावेळी त्यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीचे ऑनलाईन उध्दघाटन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून घरगंटी आणि शिलाई मशिनच्या ११ हजार लाभार्थ्यांपैकी प्राथनिधीक स्वरुपात शिलाई मशिनचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाय योजना कृती आराखड्याचे (हिट अ‍ॅक्शन प्लॅन) उद्घघाटनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र स्कोअरकार्डउद्योजकता आणि महिला उद्योजक धोरण अहवाल याचेही प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे