शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:31 IST

जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : नाणार, जैतापूर प्रकल्पांना होणारा विरोध हा समजून घेतला पाहिजे. कोणताही मोठा प्रकल्प येतो, त्या वेळी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण केले जात असल्याने लोकांच्या जीवनावरच अतिक्रमण होते. लोकांचा अनुभव बऱ्याच ठिकाणी फारसा चांगला नाही. जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सहयोग मंदिर येथे ‘भेट दिग्गजांची’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. काकोडकर यांची जाहीर मुलाखत झाली. डॉ. काकोडकर म्हणाले की, जैतापूर प्रकल्पाला एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नाणार प्रकल्पाला देखील अशा प्रकारची गुंतवणूक आहे. यात मात्र बाहेरच्या लोकांचा आणि स्थानिकांचा किती फायदा होतो, यातून समाजात तेढ निर्माण होते. कोणत्याही प्रकल्पाबाबत समाजप्रबोधन आधी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ली प्रकल्पांना विरोध करायलादेखील कोट्यवधी रुपये वाटले जातात. प्रकल्पांमुळे समाजावर परिणाम होतो हे नक्की, पण तो सकारात्मक व्हावा, स्थानिकांना हा प्रकल्प पटला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण तसे नाही ज्याने चांगला परिणाम होईल, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण, ज्येष्ठराज जोशी, सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वैष्णो व्हिजनचे जयू भाटकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते.

समाजमनात अणुशक्तीबाबत खोलवर भीतीआजही अणुशक्तीबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठी स्थित्यंतरे होतात तेव्हा असे गैरसमज निर्माण होत असतात. अणुशक्तीची ओळखच हिरोशिमा, नागासाकीपासून झाल्याने गैरसमज आहे. अणुशक्तीतून वीजनिर्मिती व अनेक फायदे लोकांसमोर नंतर येतात. त्यामुळे समाजमनात अणुशक्तीबाबत भीती खोलवर दडली आहे. जग पुढे बदलणार आहे. त्यामुळे आणखी ऊर्जा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे