शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

By admin | Updated: January 14, 2017 06:26 IST

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी जागा घेण्याचा प्रयत्न पालिकेने पुन्हा केला असता नागरिकांनी विरोध केला. आयुक्तांनी राजकारणी नको, असे सांगत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यासह पालिका प्रभाग समितीचे अध्यक्ष, गटनेते यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. केवळ दुकानदारांशी चर्चा करत ती जागा पालिकेची असून ताब्यात घेणारच, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजपा युतीने शांतीनगरमधील प्रभाग ३६ पूर्ण व ३८ अंशत: अटल आदर्श वॉर्ड योजनेत समाविष्ट केले आहे. या योजनेनुसार पूर्वीचा असलेला सुमारे ४० फूट रस्ता आणखी रुंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी पालिकेने इमारती व दुकानांसमोर असलेली जागा ताब्यात घेऊन त्यानुसार गटार बांधकामासाठी खोदकाम चालवले आहे. परंतु, येथील दुकानदारांचा विरोध असून गेल्या महिन्यात सेक्टर ५-६ दरम्यान रस्ता रुंदीकरणास गेलेल्या पालिका पथकाचे काम नागरिकांनी बंद पाडले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन आंदोलनात उतरले होते. दरम्यान, गुरुवारी पालिकेने सेक्टर-४ मधील रस्ता रुंदीकरण हाती घेतले. त्यावेळीही दुकानदारांनी विरोध करत काम थांबवले. पालिकेचे तसेच नयानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरकारी कामात अडथळा आणू नका,असे पोलीस सांगत होते. तर, पालिकेच्या जमिनीच्या मालकीचा ७/१२ दाखवा, असे दुकानदारांनी सांगितले. काही वेळातच स्वत: हुसेन यांच्यासह सभापती प्रमोद सामंत, काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, शफिक खान तेथे आले. त्यांनीही आधी फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढा, असे पालिका व पोलिसांना सुनावले. पालिकेच्या नावे जागाच नसून सरकारनेही अहवाल मागवला आहे. असे असताना पालिकेने आवश्यकता नसताना नियम धाब्यावर बसवून दडपशाही सुरू केली आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. तर, कोट्यवधी रुपयांच्या कामातील टक्केवारी व विकासकाला आणखी चटईक्षेत्र मिळावे, म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला. दरम्यान, आयुक्तांना सायंकाळी हुसेन यांच्यासह नागरिकांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले असता आयुक्त गीते यांनी शांतीनगर रस्तारुंदीकरण विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी केवळ दुकानदारांना बसवून त्यांच्याशी चर्चा केली. फेरीवाल्यांना हटवले तरी रस्ता मोकळा होईल, अशी दुकानदारांनी आपली भूमिका मांडली. पण, आयुक्तांनी जागा पालिकेची असूनरुंदीकरण होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)