शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

By admin | Updated: January 14, 2017 06:26 IST

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी जागा घेण्याचा प्रयत्न पालिकेने पुन्हा केला असता नागरिकांनी विरोध केला. आयुक्तांनी राजकारणी नको, असे सांगत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यासह पालिका प्रभाग समितीचे अध्यक्ष, गटनेते यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. केवळ दुकानदारांशी चर्चा करत ती जागा पालिकेची असून ताब्यात घेणारच, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजपा युतीने शांतीनगरमधील प्रभाग ३६ पूर्ण व ३८ अंशत: अटल आदर्श वॉर्ड योजनेत समाविष्ट केले आहे. या योजनेनुसार पूर्वीचा असलेला सुमारे ४० फूट रस्ता आणखी रुंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी पालिकेने इमारती व दुकानांसमोर असलेली जागा ताब्यात घेऊन त्यानुसार गटार बांधकामासाठी खोदकाम चालवले आहे. परंतु, येथील दुकानदारांचा विरोध असून गेल्या महिन्यात सेक्टर ५-६ दरम्यान रस्ता रुंदीकरणास गेलेल्या पालिका पथकाचे काम नागरिकांनी बंद पाडले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन आंदोलनात उतरले होते. दरम्यान, गुरुवारी पालिकेने सेक्टर-४ मधील रस्ता रुंदीकरण हाती घेतले. त्यावेळीही दुकानदारांनी विरोध करत काम थांबवले. पालिकेचे तसेच नयानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरकारी कामात अडथळा आणू नका,असे पोलीस सांगत होते. तर, पालिकेच्या जमिनीच्या मालकीचा ७/१२ दाखवा, असे दुकानदारांनी सांगितले. काही वेळातच स्वत: हुसेन यांच्यासह सभापती प्रमोद सामंत, काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, शफिक खान तेथे आले. त्यांनीही आधी फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढा, असे पालिका व पोलिसांना सुनावले. पालिकेच्या नावे जागाच नसून सरकारनेही अहवाल मागवला आहे. असे असताना पालिकेने आवश्यकता नसताना नियम धाब्यावर बसवून दडपशाही सुरू केली आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. तर, कोट्यवधी रुपयांच्या कामातील टक्केवारी व विकासकाला आणखी चटईक्षेत्र मिळावे, म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला. दरम्यान, आयुक्तांना सायंकाळी हुसेन यांच्यासह नागरिकांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले असता आयुक्त गीते यांनी शांतीनगर रस्तारुंदीकरण विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी केवळ दुकानदारांना बसवून त्यांच्याशी चर्चा केली. फेरीवाल्यांना हटवले तरी रस्ता मोकळा होईल, अशी दुकानदारांनी आपली भूमिका मांडली. पण, आयुक्तांनी जागा पालिकेची असूनरुंदीकरण होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)