शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कल्याण पूर्वेत काही घरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:06 IST

दोन हजार कुटुंबांना फटका; वह्या -पुस्तके वाहून गेल्याने विद्यार्थी हतबल

कल्याण : मागील आठ दिवसांत मुसळधार पावसामुळे दोन वेळा पुराचा तडाखा बसल्याने कल्याण पूर्वेतील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. वालधुनी परिसरातील अशोकनगर, शिवाजीनगर परिसरातील काही घरे सोमवारीही पाण्याखाली होती. दुसरीकडे शनिवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे जवळपास दोन हजार कुटुंबांचे अतोनात हाल झाले. चाळींतील घरांमध्ये पाच फूट पाणी साचल्याने अनेकांचे संसारच पाण्याखाली गेले. शालेय परीक्षा तोंडावर असताना काही विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके भिजली आहेत, तर काहींची वाहून गेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी, आडिवली, ढोकळी या भागाला पुराचा फटका बसला. काटेमानिवली परिसरात असलेल्या उल्हास नदीशेजारील रायगड कॉलनी, आकाशदीप, श्रीकृष्ण चाळ, मनीषा कॉलनी, गणेश बिल्डिंग या भागात शनिवारी रात्रीपासून पाणी शिरायला सुरुवात झाली. घराच्या खालील भागातून पाणी आल्याने लाद्या उखडल्या गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने काही जण नातेवाइकांच्या घरी राहायला गेले. तर, काहींनी उंच ठिकाणी आसरा घेतला. पुरात अडकलेल्यांना प्रशासनाबरोबरच तरुणांनी सुरक्षितस्थळी हलवल्याने त्यांचा जीव वाचला. स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी सकाळी पूर ओसरल्याने ही सर्व कुटुंबं घरी परतू लागली होती. मात्र, पिण्याचे पाणी नसल्याने पाणी विकत आणून प्यावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.नेहरूनगर परिसरातील विनायक कॉलनीतील सुमारे २५० घरांमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी यायला सुरुवात झाली. यावेळी, कॉलनीतील तरुणांनी या घरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. येथील काहींनी नातेवाइकांकडे तर काहींनी लॉजमध्ये आपली रात्र घालवली. पुराच्या पाण्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, कपड्यांबरोबरच वह्या-पुस्तके खराब झाली आहेत. मात्र, पालिकेचे कोणीच फिरकले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी पसरली आहे. रोगराई पसरू नये, यासाठी औषधफवारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.एसटीत काढली रात्र : खडेगोळवली परिसरात घरात पाणी यायला सुरुवात झाल्याने येथील तरुणांनी आबालवृद्धांना सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर विठ्ठलवाडी आगाराने बाहेर उभ्या केलेल्या एसटी बसेसमध्ये रात्र काढल्याचे अशोक लव्हांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस