शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत काही घरे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:06 IST

दोन हजार कुटुंबांना फटका; वह्या -पुस्तके वाहून गेल्याने विद्यार्थी हतबल

कल्याण : मागील आठ दिवसांत मुसळधार पावसामुळे दोन वेळा पुराचा तडाखा बसल्याने कल्याण पूर्वेतील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. वालधुनी परिसरातील अशोकनगर, शिवाजीनगर परिसरातील काही घरे सोमवारीही पाण्याखाली होती. दुसरीकडे शनिवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे जवळपास दोन हजार कुटुंबांचे अतोनात हाल झाले. चाळींतील घरांमध्ये पाच फूट पाणी साचल्याने अनेकांचे संसारच पाण्याखाली गेले. शालेय परीक्षा तोंडावर असताना काही विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके भिजली आहेत, तर काहींची वाहून गेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी, आडिवली, ढोकळी या भागाला पुराचा फटका बसला. काटेमानिवली परिसरात असलेल्या उल्हास नदीशेजारील रायगड कॉलनी, आकाशदीप, श्रीकृष्ण चाळ, मनीषा कॉलनी, गणेश बिल्डिंग या भागात शनिवारी रात्रीपासून पाणी शिरायला सुरुवात झाली. घराच्या खालील भागातून पाणी आल्याने लाद्या उखडल्या गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने काही जण नातेवाइकांच्या घरी राहायला गेले. तर, काहींनी उंच ठिकाणी आसरा घेतला. पुरात अडकलेल्यांना प्रशासनाबरोबरच तरुणांनी सुरक्षितस्थळी हलवल्याने त्यांचा जीव वाचला. स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी सकाळी पूर ओसरल्याने ही सर्व कुटुंबं घरी परतू लागली होती. मात्र, पिण्याचे पाणी नसल्याने पाणी विकत आणून प्यावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.नेहरूनगर परिसरातील विनायक कॉलनीतील सुमारे २५० घरांमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी यायला सुरुवात झाली. यावेळी, कॉलनीतील तरुणांनी या घरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. येथील काहींनी नातेवाइकांकडे तर काहींनी लॉजमध्ये आपली रात्र घालवली. पुराच्या पाण्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, कपड्यांबरोबरच वह्या-पुस्तके खराब झाली आहेत. मात्र, पालिकेचे कोणीच फिरकले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी पसरली आहे. रोगराई पसरू नये, यासाठी औषधफवारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.एसटीत काढली रात्र : खडेगोळवली परिसरात घरात पाणी यायला सुरुवात झाल्याने येथील तरुणांनी आबालवृद्धांना सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर विठ्ठलवाडी आगाराने बाहेर उभ्या केलेल्या एसटी बसेसमध्ये रात्र काढल्याचे अशोक लव्हांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस