शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अनधिकृत नळजोडण्या डायघरमध्ये उघडकीस, बिल्डरांना महापालिकेचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:28 IST

शीळ-डायघर परिसरात नव्याने विकास कामे सुरू असून त्याठिकाणी विकासकांनी अनधिकृतपणे नळ जोडण्या घेतली असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली.

ठाणे : शीळ-डायघर परिसरात नव्याने विकास कामे सुरू असून त्याठिकाणी विकासकांनी अनधिकृतपणे नळ जोडण्या घेतली असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. या अनधिकृत नळजोडण्यांमुळे गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसून दुसरीकडे बिल्डरांना तीन ते चार वर्षांपासून अधिकृत नळजोडण्यांची पाणी बिलेच पाठविली जात नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर पुन्हा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून डायघर भागाचा एकात्मिक विकास करण्याचे निश्चित केले आहे. या योजनेमुळे गावांमधील बांधकाम क्षेत्रालाही झळाळी मिळण्याची चिन्हे आहेत. असे असतानाच इमारतींच्या बांधकामांसाठी घेतलेल्या बेकायदा नळजोडण्यांमुळे गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याचा प्रकार नुकत्याच झालेल्या महासभेत पाण्याच्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान समोर आला. देसाई, खर्डी, शीळ आणि डायघर ही गावे मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आहेत. तर गावांलगतच्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याठिकाणी शंभरहून अधिक इमारती आहेत. त्यापैकी काहींची कामे पूर्ण झाली आहेत तर काहींची कामे सुरू आहेत. गावांमध्ये १५ ते २० वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांमधून इमारतींना अधिकृत नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, अनेक विकासकांनी जास्त पाणी मिळविण्यासाठी बेकायदा नळजोडण्या घेतल्या असून त्यांवर मोटारी बसविल्याने गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला.अधिकृत नळजोडण्यांनाही बिले नाहीत!डायघरमधील इमारतींमध्ये अधिकृत नळजोडण्यांची पाणी बिले तीन ते चार वर्षांपासून न पाठवल्याने महापालिकेचे नुकसान होत असल्याचा दावा पाटील यांनी केला. काही विकासकांनी वाढीव पाण्यासाठी घेतलेल्या बेकायदा नळजोडण्यांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, हे आरोप गंभीर स्वरु पाचे असल्यामुळे यासंदर्भात महापालिका प्रशासनाने खुलासा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे