शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

बेकायदा बांधकामे, ७६ विकासकांविरूद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:00 AM

२७ गावांमध्ये अनधिकृत इमारती; बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा आरोप

डोंबिवली : २७ गावांमध्ये जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरणाच्या काळात जिल्हा परिषदेच्या विविध परवानग्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे येथील सरकार, ग्राहक आणि वित्तीय संस्थांची फसवणूक करणाऱ्या ७६ विकासकांविरोधात ठाणे जिल्हा परिषदेच्या सहाय्यक गटविकास अधिकारी कृपाली बांगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.ठाणे जिल्ह्यातील २७ गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी २००३ ते २००६ पर्यंत त्यांचे नियोजन प्राधिकरण हे संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडे होते. त्यानंतर या गावांच्या नियोजित विकासासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ठाणे जिल्हा परिषदेला नियुक्त करण्यात आले होते. या गावांतील नागरीकरण आणि लोकसंख्येचा विचार करता या भागाचा जलद आणि नियोजित विकास होण्यासाठी या गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर ही गावे २०१५ पासून केडीएमसीमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहेत. २७ गावांतील बांधकामांना जानेवारी ते सप्टेंबर २००६ या कालावधीत परवानगी देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्राधिकरणांची होती. पण, या गावांतील काही मूळ जमीनमालक आणि विकासकांनी त्यांच्याकडील जमिनींवर बांधकाम करताना सक्षम प्राधिकरणांकडून कोणत्याही प्रकारे बांधकामासंबंधित परवानगी न घेता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृत इमारती बांधून त्या अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बनावट शिक्क्यांचा, तसेच अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षºया करून बनावट बांधकाम परवानग्या तयार केल्या आहेत. याबाबतचे बरेच अर्ज जिल्हा परिषदेकडे नागरिकांसह दुय्यम निबंधक कार्यालय आणि वित्तीय संस्थांकडून प्राप्त झाले होते. या अर्जांची पाहणी केली असता, जिल्हा परिषदेकडून देण्यात न आलेल्या ३२ प्रकरणांत बनावट परवानग्या आढळून आल्या. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रकरणांत ३५ बोगस बांधकाम परवानग्या आढळून आल्या होत्या.सर्व बोगस बांधकामांची यादी तयार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पोलीस आयुक्तांना कळवले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी ७६ विकासकांविरोधात जिल्हा परिषदेने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.