शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी

By पंकज पाटील | Updated: May 13, 2023 19:05 IST

आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी

बदलापूर: उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. 

शुक्रवारी तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम आता वीज वापरण्यावर होत आहे. विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. दिवसाच नव्हे तर रात्री देखील विजेचा वापर जास्त होत असल्याने आता वीज वितरण विभागाला अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून विजेच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. याच कारणामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा भास नागरिकांना झाला.

मात्र रात्री देखील तब्बल दोन ते अडीच तास वीस पुरवठा खंडित झाल्याने त्याचे नेमके कारण सर्वसामान्य नागरिकांना कळू शकले नाही. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण शहर एकत्रितपणे अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हा अघोषित भारनियमन कायम ठेवण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर