शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी

By पंकज पाटील | Updated: May 13, 2023 19:05 IST

आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी

बदलापूर: उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. 

शुक्रवारी तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम आता वीज वापरण्यावर होत आहे. विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. दिवसाच नव्हे तर रात्री देखील विजेचा वापर जास्त होत असल्याने आता वीज वितरण विभागाला अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून विजेच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. याच कारणामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा भास नागरिकांना झाला.

मात्र रात्री देखील तब्बल दोन ते अडीच तास वीस पुरवठा खंडित झाल्याने त्याचे नेमके कारण सर्वसामान्य नागरिकांना कळू शकले नाही. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण शहर एकत्रितपणे अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हा अघोषित भारनियमन कायम ठेवण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर