शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी

By पंकज पाटील | Updated: May 13, 2023 19:05 IST

आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी

बदलापूर: उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. 

शुक्रवारी तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम आता वीज वापरण्यावर होत आहे. विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. दिवसाच नव्हे तर रात्री देखील विजेचा वापर जास्त होत असल्याने आता वीज वितरण विभागाला अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून विजेच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. याच कारणामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा भास नागरिकांना झाला.

मात्र रात्री देखील तब्बल दोन ते अडीच तास वीस पुरवठा खंडित झाल्याने त्याचे नेमके कारण सर्वसामान्य नागरिकांना कळू शकले नाही. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण शहर एकत्रितपणे अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हा अघोषित भारनियमन कायम ठेवण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर