शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अंबरनाथ आणि बदलापुरात अघोषित भारनियमन, मागणी अधिक पण पुरवठा होतोय कमी

By पंकज पाटील | Updated: May 13, 2023 19:05 IST

आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी

बदलापूर: उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. 

शुक्रवारी तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम आता वीज वापरण्यावर होत आहे. विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे. दिवसाच नव्हे तर रात्री देखील विजेचा वापर जास्त होत असल्याने आता वीज वितरण विभागाला अघोषित भारनियमन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गेल्या आठवड्याभरापासून विजेच्या तारांजवळ असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. याच कारणामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचा भास नागरिकांना झाला.

मात्र रात्री देखील तब्बल दोन ते अडीच तास वीस पुरवठा खंडित झाल्याने त्याचे नेमके कारण सर्वसामान्य नागरिकांना कळू शकले नाही. याप्रकरणी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केले असता विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण शहर एकत्रितपणे अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हा अघोषित भारनियमन कायम ठेवण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर