शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उल्हासनगरचे खड्डे १३ कोटींवर!, १३५ टक्के वाढीव दराची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:01 IST

उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे. या कामाची निविदा १३५ टक्के वाढीव दराने आल्याने स्थायी समितीत जोरदार टीका झाली. सभापती कांचन लुंड यांच्यासह आयुक्त निंबाळकर व विविध पक्षांच्या नेत्यांनी या निविदेला विरोध केला आहे. दरम्यान, महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर यांच्यामुळे खड्ड्यांच्या दुरूल्तीचा खर्च वाढल्याचा आरोप करत ते खलनायक ठरल्याचा ठपका युवा नेता संतोष पांडे यांनी ठेवला.उल्हासनगरची रस्ता दुरूस्ती आणि खड्डे भरण्याचे काम गणेशोत्सव, चालिया उत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी व्हावे, अशी मागणी सर्व पक्षांकडून झाल्याने स्थायीने अत्यावश्यक कामाच्या नावाखाली साडेचार कोटीचा ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तो दोन ठेकेदारांना विभागून दिला. त्याला सोशल मीडियावर विरोध झाला. महापौर मीना आयलानी व आ. बालाजी किणीकर यांनीही निविदा न काढता साडेचार कोटीचा ठेका अत्यावश्यक कामाअंतर्गत देण्याला विरोध केला. अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेका रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याच्या निविदेत आणखी काही रस्त्याचा समावेश करून पाच कोटी ६५ लाखांची फेरनिविदा काढण्यात आली. त्याला १३५ टक्के वाढीव दराने प्रतिसाद मिळाला आणि निविदा थेट १३ कोटी ५० लाखांवर गेली. तिला महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर, उपमहापौर राजू इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, विरोधी पक्षनेता रमेश चव्हाण यांनी विरोध करत ठेकेदाराच्या मनमानीपणावर टीका केली. आयुक्तांनीही नाराजी व्यक्त करून चौकशीचे आश्वासन दिले. मात्र गणेश उत्सवादरम्यान २४ लाखाच्या निधीतून तात्पुरते खड्डे भरण्यास अत्यावश्यक कामाखाली परवानगी दिली.महापौर मीना आयलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधामुळेच साडेचार कोटींचा रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याचा ठेका १३ कोटी ५० लाखांवर गेल्याचा आरोप युवा नेता संतोश पांडे यांनी केला. त्यांनी कामाला विरोध केला नसता, तर रस्ते चकाचक असते. तसेच बाप्पाचे आगमन व निरोप चांगल्या रस्त्यातून झाले असते, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Potholeखड्डे