शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

उल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 02:57 IST

साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर  - साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. साईच्या फुटीर नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे वेगळ्या गटासाठी अर्ज दाखल केला असून सोमवारी महापौरपदाकरिता अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्याच दिवशी सर्व राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.शहर विकासाचे स्वप्न बघून साई पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, दीड वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास झाल्याची टीका साई पक्षातील फुटीर गटाचे नगरसेवक टोणी सिरवानी यांनी ‘लोकमत’कडे केली.सिंधी समाज दररोज शहरातून स्थलांतरित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली. मात्र, एकही काम सुरू झाले नाही. शहर विकास आराखडा, कल्याण-अंबरनाथ रस्त्याची पुनर्बांधणी, पाणीटंचाई, ठप्प पडलेल्या विकास योजना, पालिकेला सक्षम आयुक्तासह इतर अधिकारी न देणे आदी अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. शहराचे हित लक्षात घेऊन दोन दिवसांत निर्णय घेणार असून शिवसेनेने महापौरपदाची आॅफर दिली असल्याची कबुली सिरवानी यांनी दिली आहे.उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. मात्र, बहुमताएवढे त्यांचे नगरसेवक निवडून न आल्याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना मुख्यमंत्र्यांची थेट भेट घालून देऊन त्यांचा पाठिंबा मिळवला. भाजपा-ओमी टीमचे ३२, तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४४ नगरसेवक भाजपा आघाडीकडे आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. २५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ‘साई’तील शेरी लुंड गटाला महापौरपदाची आॅफर देऊन गळ टाकला होता. मात्र, ऐनवेळी चव्हाण यांनी बंडखोर नगरसेवकांच्या घरात ठाण मांडले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची करत उल्हासनगरात पाय रोवल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने २८ सप्टेंबरला महापौरपदाची निवडणूक होत आहे. सोमवारी महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यापूर्वीच साई पक्षातील सात नगरसेवक अज्ञातस्थळी गेले असून त्यांनी वेगळ्या गटासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे. या फाटाफुटीमुळे भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.डावपेचात यशस्वी होणार कोण? शिंदे की चव्हाण?साईच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौर व स्थायी सभापतीपदाची आॅफर दिल्याची चर्चा आहे. सेनेला आपली सत्ता स्थापन करण्यापेक्षा भाजपाची सत्ता घालवण्यात अधिक रस आहे. या डावपेचात शिंदे यशस्वी होतात की चव्हाण, याचे कुतूहल वाढले आहे.साई पक्षातील फुटीर गटाने महापौरपदासाठी अर्ज भरल्यास भाजपाला मोठा धक्का बसेल. अर्थात, त्यांच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असल्याने साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून ते ‘साई’तील फुटीर गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकतात.चव्हाण यांनी शनिवारी भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी ‘साई’तील भाजपासोबत असलेल्या चार नगरसेवकांना बोलावले होते. मात्र, ते फिरकले नाहीत. शहरात भाजपा, शिवसेनेऐवजी छोट्या पक्षांचे नेते खेळवत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या