शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

उल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 02:57 IST

साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर  - साई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. साईच्या फुटीर नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे वेगळ्या गटासाठी अर्ज दाखल केला असून सोमवारी महापौरपदाकरिता अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्याच दिवशी सर्व राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.शहर विकासाचे स्वप्न बघून साई पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, दीड वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास झाल्याची टीका साई पक्षातील फुटीर गटाचे नगरसेवक टोणी सिरवानी यांनी ‘लोकमत’कडे केली.सिंधी समाज दररोज शहरातून स्थलांतरित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी ३०० कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली. मात्र, एकही काम सुरू झाले नाही. शहर विकास आराखडा, कल्याण-अंबरनाथ रस्त्याची पुनर्बांधणी, पाणीटंचाई, ठप्प पडलेल्या विकास योजना, पालिकेला सक्षम आयुक्तासह इतर अधिकारी न देणे आदी अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. शहराचे हित लक्षात घेऊन दोन दिवसांत निर्णय घेणार असून शिवसेनेने महापौरपदाची आॅफर दिली असल्याची कबुली सिरवानी यांनी दिली आहे.उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. मात्र, बहुमताएवढे त्यांचे नगरसेवक निवडून न आल्याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना मुख्यमंत्र्यांची थेट भेट घालून देऊन त्यांचा पाठिंबा मिळवला. भाजपा-ओमी टीमचे ३२, तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४४ नगरसेवक भाजपा आघाडीकडे आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. २५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ‘साई’तील शेरी लुंड गटाला महापौरपदाची आॅफर देऊन गळ टाकला होता. मात्र, ऐनवेळी चव्हाण यांनी बंडखोर नगरसेवकांच्या घरात ठाण मांडले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची करत उल्हासनगरात पाय रोवल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने २८ सप्टेंबरला महापौरपदाची निवडणूक होत आहे. सोमवारी महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यापूर्वीच साई पक्षातील सात नगरसेवक अज्ञातस्थळी गेले असून त्यांनी वेगळ्या गटासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे. या फाटाफुटीमुळे भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.डावपेचात यशस्वी होणार कोण? शिंदे की चव्हाण?साईच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौर व स्थायी सभापतीपदाची आॅफर दिल्याची चर्चा आहे. सेनेला आपली सत्ता स्थापन करण्यापेक्षा भाजपाची सत्ता घालवण्यात अधिक रस आहे. या डावपेचात शिंदे यशस्वी होतात की चव्हाण, याचे कुतूहल वाढले आहे.साई पक्षातील फुटीर गटाने महापौरपदासाठी अर्ज भरल्यास भाजपाला मोठा धक्का बसेल. अर्थात, त्यांच्याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असल्याने साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून ते ‘साई’तील फुटीर गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकतात.चव्हाण यांनी शनिवारी भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी ‘साई’तील भाजपासोबत असलेल्या चार नगरसेवकांना बोलावले होते. मात्र, ते फिरकले नाहीत. शहरात भाजपा, शिवसेनेऐवजी छोट्या पक्षांचे नेते खेळवत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या