शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उल्हासनगर पालिका तिजोरीत खळखळाट, फक्त अत्यावशक कामाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:12 IST

उल्हासनगर महापालिकेचे लॉक डाऊन काळात उत्पन्न ठप्प पडल्याने पालिका कारभार शासन अनुदानावर सुरू आहे.

-सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : लॉक डाऊन दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने ठेकेदाराची बिले आयुक्तांनी थांबविली आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक कामाला मंजुरी देण्यात आली असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय योजनेकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. 

उल्हासनगर महापालिकेचे लॉक डाऊन काळात उत्पन्न ठप्प पडल्याने पालिका कारभार शासन अनुदानावर सुरू आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ठेकेदाराची कोट्यवधीचे बिले देणे थांबविले असून अत्यावश्यक कामाला प्राधान्य दिले. एलबीटी पोटी पालिकेला मिळणाऱ्या शासन अनुदानातून पालिका कारभार हाकलला जात आहे. पालिका कर्मचाऱ्याचा पगार, आरोग्य विषयक कामे, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, पावसाळ्याूर्वीचे कामे, साफसफाई आदिवर आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नागरिकांना मालमत्ता कर बिल अदा करण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त विकास चव्हाण यांनी दिली. लॉकडाऊन काळात पालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता कर स्वरुपात उत्पन्न मिळाले होते.

मात्र एप्रिल व मे महिन्यात पालिकेची तिजोरी रिकामी राहणार असल्याचे उपायुक्त चव्हाण म्हणाले. याचा परिणाम शहर विकास कामांवर होणार आहे. गेल्या महिन्यात साडे तीन कोटींच्या निधीतून पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान मोठे ४७ नाले सफाईची कामे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पासून सुरु करण्यात येणार आहे. तर इतर कामाला आयुक्तांनी ब्रेक लावल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाळा तोंडावर आला असताना पावसाळ्यापूर्वीचे कामासह इतर कामाला वेग आला नसल्याने शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी १९ मे पासून घरातच उपोषणाला बसणार असल्याचे पत्र आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले.