शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी पगारविना, कर्मचाऱ्यात असंतोष, अभय योजनेचे पैसे गेले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:17 IST

Ulhasnagar Municipal Corporation : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने, पगार झाला नाही.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने, पगार झाला नाही. असे कारण प्रशासनाकडून दिले जात असलेतरी अभय योजनेचे पैसे गेले कुठे? असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत. (Ulhasnagar Municipal Corporation employees without salary, dissatisfaction among employees, where did the money of Abhay Yojana go?)

 उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली असून सरासरी दीड कोटीची वसुली दररोज होत आहे. तर दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याची १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने, कर्मचाऱ्या मध्ये असंतोष निर्माण झाला. घराचे भाडे, गृह कर्जाचे हप्ते, शिक्षण खर्च व इतर देणी देऊन घर कसे चालवावे? असा प्रश्न कर्मचाऱ्या समोर उभा ठाकला. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कर्मचारी संघटना आता गप्प का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कर्मचारी पगाराच्या धनादेशावर सही केल्यानंतर, पगार कसा झाला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तर मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी शासनाकडून मिळणारे जीएसटी अनुदान अद्याप मिळाले नसल्याने, कर्मचारी पगाराला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र अभय योजनेद्वारे एका महिन्यात २० कोटीची वसुली झाली. ती रक्कम नेमकी गेली कुठे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

 महापालिकेचा दरमहा आस्थापनाचा एकून खर्च १९ कोटी पेक्षा जास्त असून त्यापैकी कर्मचारी पगारावर १२ कोटी खर्च होतो. तर महापालिकेला जीएसटी अनुदानपोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. अभय योजने अंतर्गत वसुली झालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का दिले नाही. असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार न देता, अभय योजने अंतर्गत जमा झालेले निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारला जात असून महापालिका प्रशासनाने याबाबत चुपकी साधली.एकूणच महापालिकेत चाललेतरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. आखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली. पगार उशिराने होत असल्याने, त्यांना पगाराच्या रक्कमेवर ६ टक्के व्याज देण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया टाक यांनी दिली.

 महापालिका कर्मचाऱ्याच्या नाराजी 

महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतुन २० कोटीची वसुली झाली. त्या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांचा पगार देणे गरजेचे होते. मात्र तसे न होता. त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी प्रथम दिल्यानेच, कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ऐवजी ठेकेदारांची देणी कोणी द्यायला लावली. असे प्रश्नही उपस्थित झाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर