शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी पगारविना, कर्मचाऱ्यात असंतोष, अभय योजनेचे पैसे गेले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:17 IST

Ulhasnagar Municipal Corporation : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने, पगार झाला नाही.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महिन्याची १५ तारीख उलटल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. शासनाकडून जीएसटीचे अनुदान न मिळाल्याने, पगार झाला नाही. असे कारण प्रशासनाकडून दिले जात असलेतरी अभय योजनेचे पैसे गेले कुठे? असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत. (Ulhasnagar Municipal Corporation employees without salary, dissatisfaction among employees, where did the money of Abhay Yojana go?)

 उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना सुरू केली असून सरासरी दीड कोटीची वसुली दररोज होत आहे. तर दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याची १५ तारीख उलटूनही झाला नसल्याने, कर्मचाऱ्या मध्ये असंतोष निर्माण झाला. घराचे भाडे, गृह कर्जाचे हप्ते, शिक्षण खर्च व इतर देणी देऊन घर कसे चालवावे? असा प्रश्न कर्मचाऱ्या समोर उभा ठाकला. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कर्मचारी संघटना आता गप्प का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कर्मचारी पगाराच्या धनादेशावर सही केल्यानंतर, पगार कसा झाला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तर मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांनी शासनाकडून मिळणारे जीएसटी अनुदान अद्याप मिळाले नसल्याने, कर्मचारी पगाराला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र अभय योजनेद्वारे एका महिन्यात २० कोटीची वसुली झाली. ती रक्कम नेमकी गेली कुठे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

 महापालिकेचा दरमहा आस्थापनाचा एकून खर्च १९ कोटी पेक्षा जास्त असून त्यापैकी कर्मचारी पगारावर १२ कोटी खर्च होतो. तर महापालिकेला जीएसटी अनुदानपोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. तसेच मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. अभय योजने अंतर्गत वसुली झालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का दिले नाही. असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार न देता, अभय योजने अंतर्गत जमा झालेले निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारला जात असून महापालिका प्रशासनाने याबाबत चुपकी साधली.एकूणच महापालिकेत चाललेतरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. आखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली. पगार उशिराने होत असल्याने, त्यांना पगाराच्या रक्कमेवर ६ टक्के व्याज देण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया टाक यांनी दिली.

 महापालिका कर्मचाऱ्याच्या नाराजी 

महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतुन २० कोटीची वसुली झाली. त्या निधीतून प्रथम कर्मचाऱ्यांचा पगार देणे गरजेचे होते. मात्र तसे न होता. त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी प्रथम दिल्यानेच, कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ऐवजी ठेकेदारांची देणी कोणी द्यायला लावली. असे प्रश्नही उपस्थित झाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर