शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांची उचलबांगडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 00:11 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची  आयुक्तपदी नियुक्ती केली.

उल्हासनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. राजा दयानिधी यांना चांगले यश लाभले असले तरी पाणीटंचाई, पाणीचोरी रोखणे, अवैध बांधकामांना प्रभावीपणे आळा घालणे आदी समस्यांच्या हाताळणीत दयानिधी यांना अपयश आल्याने त्यांची बदली केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.देशातील सर्वाधिक घनतेच्या उल्हासनगर शहराला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या बदलीनंतर कोरोना संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची  आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर कोरोनाची संख्या आटोक्यात आली असली तरी, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या ‘जैसे थे’ असून, पाणी गळती थांबता थांबत नाही. महापालिकेच्या सर्वच विभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची टीका सत्ताधारी शिवसेना व आघाडीतील मित्रपक्षाकडून होत आहे. अवैध बांधकामावर कारवाई होण्याऐवजी प्रभाग अधिकाऱ्यांच्या फक्त बदल्या होत आहेत. मालमत्ता कर व पाणीपुरवठा विभागासाठी अभय योजना लावूनही वसुली नाही. एकूणच महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.

nआयुक्त डॉ. दयानिधी यापूर्वीच्या आयुक्तांप्रमाणे शहराचा पाहणी दौरा का करीत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तसेच आयुक्त काही मोजके अपवाद सोडल्यास नगरसेवक, नागरिक व पत्रकारांना भेटत नाहीत. त्यामुळे आयुक्तांसोबत मोठ्या वर्गाचा संवाद नाही. nसत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते ‘आयुक्त बदला, शहर वाचवा’ अशी प्रतिक्रिया खाजगीत देत आहेत. जिल्हास्तरीय नेत्यांकडे आयुक्त बदलाची मागणी केली आहे, अशी चर्चा आहे. nनवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची आयुक्तपदी निवड होणार आहे, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. दयानिधी यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही. 

टॅग्स :thaneठाणे