शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

 उल्हासनगर पहिल्याच पावसाने तुंबले, रस्ते, नाल्याचे काम अर्धवट

By सदानंद नाईक | Updated: June 25, 2023 18:16 IST

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक रस्ते व नाले दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने, पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत.

 उल्हासनगर : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक रस्ते व नाले दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने, पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच गोलमैदान, राजीव गांधीनगर, आयटीआय कॉलेज आदी परिसरात पाणी साचल्याने नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. 

उल्हासनगरात एमएमआरडीए व महापालिके अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहेत. रस्त्याचे कामे केल्यानंतर रस्त्या लगत नाल्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. नियमानुसार रस्त्याचे काम झाल्यानंतर, त्या लगतच्या नालीचे काम केले जाते. मात्र याउलट प्रकार शहरात सर्रासपणे सुरू असल्याने, रस्त्याची दुरावस्था उघड झाली. पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान-मोठ्या नाल्याच्या साफसफाईचा ठेका दिला जातो. तसेच रस्स्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही प्रभाग समिती निहाय्य खाजगी ठेकेदाराला दिले जाते. मात्र यावर्षी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम झाले नसल्याने, रस्त्यात खड्डे अवतरले आहे. तर दुसरीकडे १५ जून पर्यंत नाले सफाई ९० टक्के पेक्षा जास्त झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली होती. मात्र पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडून नालेसफाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. 

शहरातील गाऊन मार्केट रस्त्याची नाली, भाटिया चौक, कारा मोटर्स रस्ता, मराठा सेक्शन स्टेशनकडे जाणारे रस्ते, बेवस चौक, कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी समोरील रस्ता, सी ब्लॉक, डॉल्फिन रस्ता, खेमानी परिसर रस्ते आदी रस्त्याचे काम झाले असून रस्त्या लगत नाल्याचे काम सुरू आहेत. पावसाळ्या पूर्वी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने, त्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच धोकादायक झाडाचे सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने, झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. उल्हासनगर पश्चिम कडून रेल्वे स्टेशनला येण्यासाठी एकमेव सीएचएम कॉलेज समोर वालधुनी नदीवर पूल जुना झाला असून तीन चाकी व चारचाकी वाहनाला बंदी असूनही पुलावरून या गाड्याची ये-जा आहे. तसेच संजय गांधीनगर येथील पुलाच्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने चाकरमानी व नागरिकांचे हाल होत आहे. 

नाला काटावरील गाळ पुन्हा नाल्यात? महापालिकेने ठेकेदाराद्वारे नाले सफाई करण्यात आली असून नाल्यातून काढलेला गाळ नाला किनारी पडून होता. पाहिल्यांच पावसात किनाऱ्यावरील गाळ नाल्यात वाहून गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर