शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर, दिव्याची कपात रद्द

By admin | Updated: December 28, 2016 04:11 IST

उल्हासनगर, दिवा आणि कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे निवडणुकीच्या

कल्याण : उल्हासनगर, दिवा आणि कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उल्हासनगर आणि दिव्याला मोठा दिलासा मिळाला आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झालेले असल्याने जादा पाणी साठवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचवेळी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालिकांनी आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव पाण्याची मागणी करावी. पुढील बैठकीत हा वाढीव कोटा मंजूर करावा, असाही निर्णय घेण्यात आला. यंदा उत्तम पाऊस पडला. चांगला पाणीसाठा उपलब्ध असूनही अवघ्या दोनच महिन्यात उल्हासनगर, दिवा आणि २७ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात तातडीची बैठक झाली. तिला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, सुभाष भोईर, महापौर अपेक्षा पाटील, राजेंद्र देवळेकर, जलसंपदा विभाग, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावे, दिवा आणि उल्हासनगर शहराला वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे लगेच सादर करावा, सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करावा, कोणत्याही प्रकारे पाणीकपात करू नये, असे निर्देश शिंदे यांनी एमआयडीसी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पाण्याचा जादा कोटा देण्यासाठी एमआयडीसीने जलसंपदा विभागाला सुधारीत करारनामा सादर करावा, असे उद्योगमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा प्रस्ताव मंजूर करून पाणीटंचाईची समस्या कायमची दूर करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिले. (प्रतिनिधी)बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे प्रस्ताव लवकरचबारवी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यास सुरूवात झाल्यावर ३४० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होईल. पाण्याची वाढीव गरज भागवणे शक्य होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाले की वाढीव पाणीसाठा उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांना उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे पालिकांमध्ये सामावून घेण्यात येणार असून त्यासाठी लवकर प्रस्ताव सादर करण्याची सूचना शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली.गावांत नळजोडण्याकल्याण-डोंबिवली महापालिकेला गावांमध्ये नळ जोडण्या, तसेच टँकर फिलिंग पॉर्इंट आवश्यक आहेत. ते एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी द्यावे, असे पालकमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.